शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमृतवाहिनी कार्यक्रमात घराणेशाहीलाच मान ? भुयार यांना वगळल्याने सोशल मीडियावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 16:00 IST

भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या युवा नेत्यांची विधासभेत एन्ट्री झाली. या नेत्यांना बाळासाहेब थोरात यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते. मात्र यात सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  आमदार देवेंद्र भुयार हे  दिसले नाही. त्यामुळे सर्वसामान्य पार्श्वभूमी लाभलेले भुयार उपेक्षीत का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.  

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवारांचे नातू रोहित पवार, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, ऋतुराज पाटील ही मंडळी पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झाली आहे. सध्या सोशल मीडियावर हे युवा नेते चर्चेत आहे. तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या देवेंद्र भुयार यांचीही चर्चा नेहमीच होते. भुयार यांनी मागील सरकारमधील कृषीमंत्र्यांचाच पराभव केला आहे. त्यामुळे ते तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. 

दरम्यान अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात घराणीशाहीलाच प्राधान्य देण्यात आले अशी चर्चा सुरू झाली आहे.  संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्धीकी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांनाच राजकीय वारसा लाभलेला आहे. यावेळी या नेत्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेले देवेंद्र भुयार दिसले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.