शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विकासकामे कागदावरच : निधी मिळूनही खर्चाबाबत अनास्था, राज्यात ३८ टक्केच निधी खर्च!

By अतुल कुलकर्णी | Published: January 23, 2018 3:48 AM

राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत.

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत.आर्थिक वर्ष संपण्यास फक्त दोन महिने शिल्लक असताना पाच प्रमुख विभागांनी अद्याप १० टक्के निधीदेखील खर्च केलेला नाही.जलसंपदा विभागाला सर्वाधिक १०,५३२.३०३ कोटी म्हणजे ७६.५३ टक्के निधी मिळाला असताना, या विभागाने १३३२.८२० म्हणजे फक्त ९.६८ टक्केच निधी खर्च केला आहे.राज्यात सर्वत्र खड्डेच खड्डे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळालेल्या ११०३७.४८५ कोटी म्हणजे ७१.९६ टक्केनिधीपैकी फक्त १२८८.७२३ कोटी म्हणजे ८.४० टक्केच निधी खर्च केला आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. येणा-या वर्षात कोणत्या विभागाच्या मागण्या काय आहेत याचा आढावा घेण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून वित्तविभागाने सुरू केले आहे. त्या वेळी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्याचे एकूण बजेट ३,६९,१८५.३१३ कोटी रुपयांचे होते. त्यापैकी २,२७,१०२.८५५ कोटी रुपये वित्तविभागाने त्या त्या विभागांना वर्ग केले. मात्र त्यापैकी आजच्या तारखेपर्यंत फक्त १,४०,६३९.८८ कोटी खर्च झाले आहेत. याचा अर्थ एकूण बजेटच्या फक्त ३८.०९४ टक्केच निधी खर्च झाला आहे.

ज्या विभागांनी निधी देऊनही खर्च केलेला नाही, त्यांचा तातडीने आढावा घेतला जाईल. गेल्या दोन दिवसांपासून आपण रोज चार ते पाच विभागांचा आढावा घेतच आहोत. दिलेला निधी विकासकामांसाठी आहे त्यामुळे तो खर्च झाला नाही, तर त्याची कारणे शोधली जातील व संबंधित मंत्र्यांना त्याबद्दल विचारणा केली जाईल.- सुधीर मुनगंटीवार, वित्त मंत्रीतुम्हाला आमच्यापेक्षा लवकर माहिती मिळते. तरीपण अधिक माहिती घेऊन सांगतो. आमच्याकडे पंतप्रधान आवास योजनेसाठी निधी आला; पण प्रकल्पांना मंजुरीच मिळाली नाही. त्यामुळे निधी खर्च झाला नाही.- प्रकाश मेहता,गृहनिर्माण मंत्रीआम्हाला विकासकामासाठी ४७५८ कोटी मिळाले. त्यापैकी १९९८ कोटी खर्च झाले आहेत. उद्या आपण विभागाची आढावा बैठक घेणार आहोत. आम्ही खड्डे बुजवण्यासाठी जवळपास १६०० कोटी खर्च केले आहेत.- चंद्रकांत पाटील,बांधकाम मंत्रीआम्ही महामंडळनिहाय खर्च करतो. त्यामुळे आमचा खर्च बिम्स प्रणालीवर दिसत नाही. आम्हाला १०,५३२.३२ कोटी मिळाले होते. त्यापैकी आम्ही ८५५९.६४ कोटी खर्च केले आहेत.- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्रीएवढे पैसे आमच्या विभागाला दिले हे मी पहिल्यांदाच ऐकले. आम्ही नमामि चंद्रभागेसाठी निधी दिला; व १५ कोटींची टेंडर येत्या आठ दिवसांत निघतील. आम्हाला बजेटमध्ये खूप पैसे सांगतात, मिळत मात्र काहीच नाही.- रामदास कदम, पर्यावरण मंत्री