शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मुंबईचा विकास आराखडा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 21:45 IST

विकास आराखड्याच्या आढावा समितीवर सदस्य नेमण्यावरुन पेचात पडलेल्या शिवसेनेने अखेर राजकीय खेळी करीत आपला बचाव केला़

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ : विकास आराखड्याच्या आढावा समितीवर सदस्य नेमण्यावरुन पेचात पडलेल्या शिवसेनेने अखेर राजकीय खेळी करीत आपला बचाव केला़ विरोधी पक्ष की मित्रपक्ष या अडचणीतून सुटका करुन घेण्यासाठी सर्वच गटनेत्यांना संधी देण्याची सुचना शिवसेनेने मांडली़ यास काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी समर्थन केले़ त्यानुसार हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविण्यात आल्याने शहराचा नियोजन आराखडा महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़

सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईचे नियोजन करणारा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे़ यावर तब्बल १३ हजार हरकती व सुचना नागरिकांनी पाठविल्या आहेत़ या सुचनांवर सुनावणीसाठी सात सदस्य समिती नेमण्यात येणार आहे़ यापैकी चार राज्य शासनाचे अधिकारी असून तीन सदस्य पालिकेच्या स्थायी समितीवरील असणार आहेत़ दोन सदस्य सत्ताधाऱ्यांचे ठरलेले असल्याने तिसरा कोण असा पेच शिवसेनेला पडला होता़

यावर आज पालिकेच्या महासभेत घोषणा करणे भाग असल्याने सर्वच गटनेत्यांची नियुक्ती या समितीवर करण्याची उपसुचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मांडला़ दोन तास रंगलेल्या या चर्चेत २५ हून अधिक नगरसेवकांनी भाग घेतला़ यास विरोध दर्शवित विकास आराखडा लांबणीवर टाकण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला़ मात्र शिवसेना भाजपाने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविला़ प्रतिनिधीविकास आराखड्याचा वाद कायमविकास नियोजन आराखड्यातील काही तरतुदींवरुन वाद निर्माण झाला होता़ अखेर मुख्यमंत्र्यांनी तो आराखडा रद्द करुन सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार सुधारित मसुद्याच्या हरकती व सुचनांवर सुनावणी होणार आहे़ नवीन वाद टाळण्यासाठी ही आढावा समिती नेमण्यात येणार होती़ या समितीमार्फत नागरिकांच्या तक्रारींवर अभ्यास होऊन तोडगा काढण्यात येणार होता़ मात्र सदस्य नियुक्तीवरुन आता नव्याला वादाला तोंड फुटल्याने गेले दोन वर्षे रखडलेला हा आराखडा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे़शिवसेनेने असा केला बचावझोपडपट्ट्यांचे आरक्षण टाकलेले आहेत़ त्याचा विकास कसा करणार, त्याचा अंतर्भाव विकास आराखड्यात नाही़ अशा अनेक विषयांना नियोजन समितीला सामोरे जावे लागणार आहे़ १९९२ आणि २०१६ या सालामध्ये वाढलेल्या लोकसंख्येची मोठी तफावत आहे़ परिणामी विकास आराखड्याचा व्यापही वाढला आहे़ त्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांचा या नियोजन समितीत सहभाग असावा, अशी भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मांडली़