शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कॉर्पोरेट्स व शासनाच्या भागीदारीतून देशाचा विकास शक्य! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:37 IST

कॉर्पोरेट, शासन आणि नागरिक एकत्र आल्यास देशाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई : कॉर्पोरेट, शासन आणि नागरिक एकत्र आल्यास देशाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी पार पडलेल्या ‘द सीएसआर एक्सलेंस पुरस्कार’ वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, कॉर्पोरेट्सने राज्यातील शाळा व महाविद्यालय उभारणीपासून रोजगारनिर्मिती व पर्यावरण संवर्धनात वाटा उचलण्याची गरज आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातून मिळणाºया नफ्याच्या बदल्यात समाजाला मोबदला द्यायलाच हवा. त्यातूनच कॉर्पोरेट्सची सामाजिक बांधिलकी दिसते. गतवर्षी राज्यात सीएसआरच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली. राज्याच्या विकासासाठी शासन अर्थसंकल्पात ठरावीक निधीची तरतूद करतच असते. मात्र ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा अपुरी पडेल, तिथे कॉर्पोरेट्सने स्वत:ची यंत्रणा आणि साधने वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. सध्या राज्यातील १ हजार गावांमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रकल्प सुरू आहे. त्यात कॉर्पोरेट्स व तरुणांची मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. लवकरच या गावांतील बदल देशासमोर मांडण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएसआर फंडातून सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया कॉर्पोरेट्सला गौरवण्यात आले. त्यात शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, शेती आणि ग्रामीण विकास, आरोग्य आणि स्वच्छता, महिला सक्षमीकरण व बाल कल्याण, पर्यावरण, पशुकल्याण, क्रीडा या सात क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावणाºया प्रकल्पांना पुरस्कृत करण्यात आले. विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश असलेल्या ज्युरीने या पुरस्कारांची निवड केली.या ज्युरींमध्ये आयआयसीएचे माजी महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर चॅटर्जी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, गुंजचे संस्थापक अंशु गुप्ता, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विशेष कार्याधिकारी (ओएसडी) दुर्गा शक्ती नागपाल, जेएसएल फाउंडेशनचे संस्थापक सृष्टी जिंदाल, मुंबईच्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त अनिल कुमार, जागतिक बँकेच्या कार्यक्रमांचे लेखा परीक्षक निरंजन जोशी, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षा इंद्रा मालो, ‘इंडिया टुडे मॅगझिन’चे उपसंपादक उदय माहुरकर, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांचा समावेश होता. या वेळी सर्व ज्युरी सदस्यांसह मुख्यमंत्र्यांना पुरस्कार सोहळ्याचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार अमित उपाध्याय यांनी पोट्रेट देऊन गौरविले.पुरस्कार विजेत्यांची नावे-या सोहळ्यात भारती फाउंडेशनच्या सत्य भारती स्कूल प्रोग्रॅम प्रकल्पाला शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण विभागातील, तर रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या उन्नती प्रकल्पाला कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरवण्यात आले. मॅग्मा फिनकॉर्प लिमिटेडच्या एम-केअर मोबाइल क्लिनिकला आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील कामगिरीसाठी, तर डीसीबी बँकेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याणाचे काम करणाºया सोसिएट जनरेलच्या रग्बी इन इंडिया या प्रकल्पाने पुरस्कारावर आपले नाव कोरले. तसेच नव्याने सामील करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारात गो स्पोटर््स फाउंडेशनच्या पॅरा चॅम्पियन्स प्रोग्रॅम आणि पशुकल्याण प्रकारात अ‍ॅनिमल राहतच्या कम्युनिटी लेड अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल अ‍ॅण्ड अँटी रेबिज (एबीसी अ‍ॅण्ड एआर) प्रोग्रॅमला पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार