शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

“ठाकरे गटाच्या हातचे तेलही गेले, तुपही गेले, आता संजय राऊतांना उपरती झाली”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:04 IST

DCM Eknath Shinde: विधानसभेला लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

DCM Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यातच संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. 

शिवसेना आणि भाजपाची युती तुटली, तेव्हा कम्युनिकेशन गॅप झाला होता, अशा आशयाचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, संजय राऊतांना आता या गोष्टीची आठवण झाली का, बैल गेला आणि झोपा केला, असे आहे की काय, ठाकरे गटाच्या हातून सगळे गेले आहे. तेलही गेले आणि तूपही गेले. संजय राऊतांना आता उपरती झाली, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

२०१९ ला या राज्यातील जनतेने तत्कालीन युतीला स्पष्ट कौल दिला होता. परंतु, स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, बाळासाहेबांचे विचार सोडले. आता तेच म्हणायला लागले आहेत की, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना स्मारकाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देणार नाही. बाळासाहेबांचे स्मारक शासन करत आहे. बाळासाहेब कोणा एकट्या दुकट्याचे नाहीत. बाळासाहेबांनी लोकनेते म्हणून समाजासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे एक धोरण होते. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, हिंदुत्वासाठी धोरण होते. आता त्यांचे आणि हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यांना विधानसभेला लोकांनी धडा शिकवला. आता बोलून त्याचा काही उपयोग आहे का, असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, उद्धव ठाकरे येणार असतील, तर स्वागत करू, अशी विधाने भाजपाकडून सुरू झाल्यासंदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शाह शिर्डीला आले होते. त्यांचे भाषण तुम्ही ऐका. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत