शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

“पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे”; पालकमंत्रीपद तिढ्यावर DCM एकनाथ शिंदे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:08 IST

Deputy CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून येऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Deputy CM Eknath Shinde News: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यांवरून महायुतीत चांगल्याच कुरबुरी झाल्याचे पाहायला मिळाले. नाराजीचे मानापमान नाट्य रंगले. आता पालकमंत्रीपदावरून महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोगावले समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

पदापेक्षा जनतेला काय मिळेल ते महत्त्वाचे

पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला पदापेक्षा या महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. जो विकास आम्ही अडीच वर्षे केला, तो अधिक वेगवान गतीने करायचा आहे. आम्हाला पदांपेक्षा जनतेची नाळ महत्त्वाची आहे. मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार, हे पाहणारे आम्ही लोक आहोत, असे सांगत कोट मंत्रि‍पदासाठी असतो, पालकमंत्रीपदासाठी नाही, असा टोलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून आले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी एक बैठक घेऊन पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खटके उडताना दिसत आहे. सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात फिरू न देण्याची भाषा शिवसेना शिंदे गटाकडून केली जात आहे. भरत गोगावले यांचे समर्थक या प्रकरणी चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कसा सोडवला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती