शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 23:51 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावार भाष्य केलं होतं. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय पचला नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं, असेही राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांना मिळालेल्या जागांवर प्रश्न उपस्थित केला होता. आता अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच अजित पवार यांना ४२ जागा आणि शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा मिळाल्या असा सवालही राज ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा उल्लेख केला आहे.

भूमिका मांडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर केलेल्या  वक्तव्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस १७ जागाच मिळाल्या, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाहीत की, आमची एक जागा आली आम्ही काय करायचं?" असा टोला अजित पवार यांनी लगावला.

"अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता. या वेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत घेतली होती. तुम्ही सगळे बघत होता. मलाही एका लोकसभेच्या निवडणुकीत मुलाला निवडून आणता आलं नाही . माझ्या पत्नीलाही या लोकसभा निवडणुकीत निवडून आणता आलं नाही. पण लोकांनी कौल दिला. त्यात ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीत मान्य केलं पाहिजे", असं अजित पवार यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला ? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे," असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरे