शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 23:51 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावार भाष्य केलं होतं. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय पचला नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं, असेही राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांना मिळालेल्या जागांवर प्रश्न उपस्थित केला होता. आता अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच अजित पवार यांना ४२ जागा आणि शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा मिळाल्या असा सवालही राज ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा उल्लेख केला आहे.

भूमिका मांडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर केलेल्या  वक्तव्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस १७ जागाच मिळाल्या, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाहीत की, आमची एक जागा आली आम्ही काय करायचं?" असा टोला अजित पवार यांनी लगावला.

"अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता. या वेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत घेतली होती. तुम्ही सगळे बघत होता. मलाही एका लोकसभेच्या निवडणुकीत मुलाला निवडून आणता आलं नाही . माझ्या पत्नीलाही या लोकसभा निवडणुकीत निवडून आणता आलं नाही. पण लोकांनी कौल दिला. त्यात ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीत मान्य केलं पाहिजे", असं अजित पवार यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला ? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे," असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरे