शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

‘कर्मोलोदया’च्या ४ मुलींना डेंगी

By admin | Updated: August 25, 2016 01:39 IST

शासकीय विशेष मुलींचे वसतिगृहातील चार मुलींना डेंगीची लागण झाली असून, एक सिस्टर गेल्या आठ दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे.

शिरूर : येथील शासकीय विशेष मुलींचे वसतिगृहातील चार मुलींना डेंगीची लागण झाली असून, एक सिस्टर गेल्या आठ दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. एकीकडे ही समस्या असताना हे वसतिगृह चालवणाऱ्या ‘कर्मोलोदया’ या संस्थेला गेल्या दीड वर्षाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. निधीअभावी १४ कर्मचाऱ्यांना दीड वर्षापासून पगार देता आला नसून, शासनाच्या या भूमिकेमुळे कर्मोलोदयाचे व्यवस्थापन हतबल झाले आहे.वसतिगृहात ५२ विशेष मुली असून, कर्मोलोदया ही एनजीओ या मुलींचे १९९७ पासून संगोपन करीत आहे. गेल्या तीन दिवसांत या मुलींपैकी चार मुलींना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेच्या एक सिस्टर विनया यांच्या मेंदूत ताप गेल्याने त्यादेखील गेल्या आठवड्यापासून आयसीयूमध्ये आहेत. या सिस्टर व मुली येथील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयात दाखल असून, हे रुग्णालय या सर्वांचा मोफत उपचार करीत आहे. मुलींसाठी तर स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, लागणाऱ्या मेडिसीनचा खर्च कर्मोलोदयाला करावा लागत आहे. मृत्यूशी झुंज देणारी सहकारी तसेच डेंगीची लागण झालेल्या मुली पाहून या वसतिगृहाच्या अधीक्षिका सिस्टर डोमीनी यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आतातरी अनुदान द्या, अशी विनंती केली. मात्र, आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. ‘कर्मोलोदया’ या ५२ मुलींचे संगोपन अगदी आईवडिलांप्रमाणे करीत आहे. सर्व कर्मचारी या मुलींना जीव लावतात. मात्र, या कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना दीड वर्षांपासून पगार देता आला नाही. अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याच्या (महिला) दोन बालकांना न्यूमोनिया झाला होता. संस्थेने मात्र या बालकांचा खर्च केला. मात्र, आता कशाकशाचा खर्च उचलायचा, असा प्रश्न संस्थेसमोर उभा ठाकला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय पाचंगे यांना ‘कर्मोलोदया’च्या समस्येबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी जि. प. समाजकल्याण विभागाच्या प्रोबेशनल आॅफिसर मंजिरी देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही प्रशासकीय पद्धतीची उत्तरे दिली. दीड वर्षांपासून अनुदान का थकले, याचे उत्तर त्यांना देता आले नाही. (वार्ताहर)>वसतिगृह अपंग आयुक्तालयाच्या नियंत्रणात आल्यापासून सातत्याने अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत. सततच्या या समस्येमुळे ‘कर्मोलोदयाचे’ वरिष्ठ कार्यालय हे वसतिगृह सोडण्याच्या मनस्थितीत आहे. कर्मोलोदयाचे येथील प्रमुख तसेच सहकारी मुलींना सोडून जाऊशी वाटत नसल्याचे सांगतात़१९९७ पूर्वी या मुलींची अवस्था अतिशय वाईट होती. या संस्थेने वसतिगृह चालवण्यास घेतल्यापासून विश्वास बसणार नाही असा या मुलींत बदल घडवला आहे. अशात या संस्थेने हे वसतिगृह सोडून दिल्यास त्यांची अवस्था पूर्वीप्रमाणेच होईल.मुलींवर उपचार सुरू आहेत़ त्यांची काळजी घेतली जात असून माणुसकीच्या भावनेतून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापक अंबरीश सूर्यवंशी यांनी सांगितले.