शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वसंतदादा’च्या कामगारांचा एल्गार,उद्यापासून बेमुदत उपोषण, ४७ कामगारांना सेवेत घेण्यासह गुन्हे मागे घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:47 IST

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेत घेतले नाही. तसेच संघटनेवर  घातलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह २० मागण्यांसाठी वसंतदादा कारखान्यातील सर्व कामगार दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसणार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेत घेतले नाही. तसेच संघटनेवर  घातलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासह २० मागण्यांसाठी वसंतदादा कारखान्यातील सर्व कामगार दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती साखर कामगार युनियन (इंटक) चे जनरल सेके्रटरी प्रदीप शिंदे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, वसंतदादा कारखाना खासगी कंपनीस चालविण्यास देण्यासह विविध घडामोडींत एक पाऊल मागे घेऊन कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाला सहकार्य केले, तरीही कामगारांचा छळ चालूच आहे. म्हणूनच आंदोलनाचे रणशिंग फुंकावे लागले आहे. संघटनेवर नाहक गुन्हे दाखल केले असून, ते सर्व मागे घेण्याची आमची मागणी आहे. दि. १ जुलै २०१७ पासून ५३ कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाºयांना ग्रॅच्युईटीची रक्कम  त्वरित मिळाली पाहिजे. सेवेतील ४७ कामगारांना दत्त इंडिया कंपनीने सेवेतच घेतले नसल्यामुळे त्या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या कामगारांना त्वरित कामावर घेतले पाहिजे. कारखान्याकडील सेवेत असणाºया कर्मचाºयांचे सप्टेंबर ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीतील पगार मिळाला पाहिजे. वारंवार मागणी करूनही तो पगार दिला जात नाही. कारखान्याकडे कर्मचाºयांची थकीत रकमा असून, त्या देण्याचे दत्त इंडिया कंपनीने मान्य करूनही देण्यास टाळाटाळ होत आहे. कर्मचाºयांनी गरज म्हणून कमी पगारावरही काम करण्याची तयारी दर्शविली आहे. एवढे सहकार्य करुनही कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांचा मानसिक छळ केला जात आहे. व्यवस्थित बोलले जात नाही. कारखान्याचा काटा बंद पाडला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गुन्हा दाखल केला साखर कामगार युनियनच्या पदाधिकाºयांवर. अशापध्दतीने प्रत्येकाचा छळ कारखाना पदाधिकाºयांकडून चालू आहे, असा आरोप प्रदीप शिंदे यांनी केला. कारखाना प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी दि. २५ डिसेंबरपासून कारखाना गेटसमोरच बेमुदत उपोषणाला बसणार आहे. यातूनही तोडगा निघाला नाही, तर   दि. १ जानेवारीपासून सर्व कामगार बेमुदत संपावर जातील, असा इशाराही त्यांनी दिला.कामगारांना गुलामगिरीप्रमाणे वागणूककामगारांच्या घामावर कारखाना उभा राहिला असतानाही सध्या वसंतदादा कारखान्याचे पदाधिकारी व कंपनीचे अधिकारी कामगारांना गुलामगिरीप्रमाणे वागणूक देत आहेत. कामगारांचा होणारा छळ आम्ही कदापी सहन करणार नाही, असा इशाराही प्रदीप शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली