शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2018 03:44 IST

हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या.

मुंबई : हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. यात विविध पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादन, पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले देण्यासाठी सगळ्यात जास्तम्हणजे तब्बल ३ हजार कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे.मार्चमध्ये सरकारने ३ लाख ३८ हजार ८१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, पावसाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. भाजपा शिवसेनाचा कार्यकाळ आॅक्टोबर, २०१९ला संपणार आहे. त्यामुळे मार्च, २०१९ला पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही आणि मांडला तरी त्याचा वापर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ करता येणार नाही, म्हणून या हिवाळीअधिवेशनात जास्तीतजास्त निधी देण्याचे नियोजन केल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.मदतीसाठी २,२०० कोटीखरीपात दुष्काळ घोषित केल्यामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी २२०० कोटी, महावितरण कंपनीच्या कृषी व यंत्रमागधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी २००० कोटी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामांसाठी १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत १,००० कोटी, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्यामॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ७०० कोटी, सहकारी संस्थांसाठीच्या अटल अर्थसाहाय्य योजनेसाठी५०० कोटी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ४२५ कोटी, नगरपरिषदांना विविध कामांसाठी ३२० कोटी अशा तरतुदी केल्या आहेत.अर्थसंकल्पाच्या नियोजनाचा अभाव, विभागांवर मंत्र्यांचे, सचिवांचे दुर्लक्ष यामुळे पुरवणी मागण्या वाढतात, असा आक्षेप विरोधी पक्षात असताना भाजपाचे नेते करत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या बोलण्याचा विसर पडला आहे.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेतेकागदावर आकडे दाखवायचे आणि प्रत्यक्षात कामांना कात्री लावायची, ही जनतेची फसवणूक आहे. मार्च २००९ मध्ये आणखी एकदा पुरवणी मागण्या मांडण्याची संधी वित्तमंत्री सोडतील, असे वाटत नाही. - जयंत पाटील, माजी वित्तमंत्रीकाँग्रेस, राष्टÑवादीने यापेक्षा जास्त मागण्या मांडल्या होत्या. आम्ही दुष्काळावर मात व शेतकºयांनामदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून या मागण्या आहेत. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा