शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2018 03:44 IST

हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या.

मुंबई : हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. यात विविध पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादन, पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले देण्यासाठी सगळ्यात जास्तम्हणजे तब्बल ३ हजार कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे.मार्चमध्ये सरकारने ३ लाख ३८ हजार ८१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, पावसाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. भाजपा शिवसेनाचा कार्यकाळ आॅक्टोबर, २०१९ला संपणार आहे. त्यामुळे मार्च, २०१९ला पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही आणि मांडला तरी त्याचा वापर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ करता येणार नाही, म्हणून या हिवाळीअधिवेशनात जास्तीतजास्त निधी देण्याचे नियोजन केल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.मदतीसाठी २,२०० कोटीखरीपात दुष्काळ घोषित केल्यामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी २२०० कोटी, महावितरण कंपनीच्या कृषी व यंत्रमागधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी २००० कोटी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामांसाठी १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत १,००० कोटी, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्यामॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ७०० कोटी, सहकारी संस्थांसाठीच्या अटल अर्थसाहाय्य योजनेसाठी५०० कोटी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ४२५ कोटी, नगरपरिषदांना विविध कामांसाठी ३२० कोटी अशा तरतुदी केल्या आहेत.अर्थसंकल्पाच्या नियोजनाचा अभाव, विभागांवर मंत्र्यांचे, सचिवांचे दुर्लक्ष यामुळे पुरवणी मागण्या वाढतात, असा आक्षेप विरोधी पक्षात असताना भाजपाचे नेते करत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या बोलण्याचा विसर पडला आहे.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेतेकागदावर आकडे दाखवायचे आणि प्रत्यक्षात कामांना कात्री लावायची, ही जनतेची फसवणूक आहे. मार्च २००९ मध्ये आणखी एकदा पुरवणी मागण्या मांडण्याची संधी वित्तमंत्री सोडतील, असे वाटत नाही. - जयंत पाटील, माजी वित्तमंत्रीकाँग्रेस, राष्टÑवादीने यापेक्षा जास्त मागण्या मांडल्या होत्या. आम्ही दुष्काळावर मात व शेतकºयांनामदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून या मागण्या आहेत. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा