शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजपा सरकारने मांडल्या विक्रमी २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2018 03:44 IST

हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या.

मुंबई : हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्याचा विक्रम भाजपा शिवसेना सरकारने कायम ठेवला असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २०,३२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या. यात विविध पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादन, पुनर्वसन व सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाची बिले देण्यासाठी सगळ्यात जास्तम्हणजे तब्बल ३ हजार कोटींच्या तरतुदीचा समावेश आहे.मार्चमध्ये सरकारने ३ लाख ३८ हजार ८१९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर, पावसाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या. भाजपा शिवसेनाचा कार्यकाळ आॅक्टोबर, २०१९ला संपणार आहे. त्यामुळे मार्च, २०१९ला पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही आणि मांडला तरी त्याचा वापर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ करता येणार नाही, म्हणून या हिवाळीअधिवेशनात जास्तीतजास्त निधी देण्याचे नियोजन केल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले.मदतीसाठी २,२०० कोटीखरीपात दुष्काळ घोषित केल्यामुळे मदतीचे वाटप करण्यासाठी २२०० कोटी, महावितरण कंपनीच्या कृषी व यंत्रमागधारक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी २००० कोटी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामांसाठी १,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत १,००० कोटी, इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्यामॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी ७०० कोटी, सहकारी संस्थांसाठीच्या अटल अर्थसाहाय्य योजनेसाठी५०० कोटी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ४२५ कोटी, नगरपरिषदांना विविध कामांसाठी ३२० कोटी अशा तरतुदी केल्या आहेत.अर्थसंकल्पाच्या नियोजनाचा अभाव, विभागांवर मंत्र्यांचे, सचिवांचे दुर्लक्ष यामुळे पुरवणी मागण्या वाढतात, असा आक्षेप विरोधी पक्षात असताना भाजपाचे नेते करत होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या बोलण्याचा विसर पडला आहे.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेतेकागदावर आकडे दाखवायचे आणि प्रत्यक्षात कामांना कात्री लावायची, ही जनतेची फसवणूक आहे. मार्च २००९ मध्ये आणखी एकदा पुरवणी मागण्या मांडण्याची संधी वित्तमंत्री सोडतील, असे वाटत नाही. - जयंत पाटील, माजी वित्तमंत्रीकाँग्रेस, राष्टÑवादीने यापेक्षा जास्त मागण्या मांडल्या होत्या. आम्ही दुष्काळावर मात व शेतकºयांनामदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून या मागण्या आहेत. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा