शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेने घातले थेट राष्ट्रपतींना साकडे, पत्र पाठवून बुलेट ट्रेन रद्द करण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:49 IST

विरोध डावलूनही जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम जोमाने सुरु आहे. त्यामुळे आता या ट्रेनच्या विरोधात मनसेने थेट देशाच्या राष्ट्रपतींना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातून ५० हजार पत्र पाठविली जाणारआधी अंतर्गत रेल्वे व्यवस्था मजबुत करण्याची केली मागणी

ठाणे - बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असतांना आता महाराष्ट्र नविनर्माण सेनेने थेट भारताच्या राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प नको यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेट येथील पोस्ट आॅफिसबाहेर पत्रपेटीमध्ये रांग लावून पत्र पोस्ट केले. ठाण्यातून राष्ट्रपतींना ५० हजारांपेक्षा जास्त पत्र पाठवून महाराष्ट्रात हा प्रकल्प नको अशी विनंती त्यांना करण्यात येणार असून यासाठी रेल्वे स्थानक आणि बसस्थाकावर ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.           मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनला महाराष्ट्र नविनर्माण सेनेचा आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात येत असून जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व्हेला देखील यापूर्वी मनसेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. मनसेचा विरोध डावलून शासनाच्या वतीने मोजणीचे काम सुरूच असल्याने अखेर राष्ट्रपतींना याबाबत मनसेच्या वतीने साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे त्या रेल्वेचा विकास करण्याची विनंती केली आहे. देशातील १२५ करोड जनता अंतर्गत रेल्वेवर अवलंबून आहे. मात्र मूठभर श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवला जात आहे. दरवर्षी अपघातामध्ये हजारो नागरीक मरण पावतात. तर काही नागरिकांना कायमचे अपंगत्व येते. मुंबईमध्ये तर रेल्वेचा प्रवास अतिशय जीवघेणा झाला आहे. आपल्या पत्रामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे देखील उदाहरण दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी रेल्वे फाटक नसल्यामुळे काही शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अंतर्गत रेल्वेमध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी काही श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनवर करोडो रु पये खर्च करणे कितपत योग्य आहे असा सवाल या पत्रामध्ये मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.        देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही रेल्वे सेवा पोहचलेली नाही. त्यामुळे आधी ही अंतर्गत रेल्वे सेवा सुधारावी आणि बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आम्ही पत्रामध्ये केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. राष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रकल्प नको म्हणून पत्र पाठवत आहोत. अजूनही ५० हजार पत्र पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासन याबाबत काही ठोस पावले उचलत नसले तरी मनसे बुलेट ट्रेनला कायम विरोध करत राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेrailwayरेल्वे