शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेने घातले थेट राष्ट्रपतींना साकडे, पत्र पाठवून बुलेट ट्रेन रद्द करण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:49 IST

विरोध डावलूनही जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या सर्व्हेचे काम जोमाने सुरु आहे. त्यामुळे आता या ट्रेनच्या विरोधात मनसेने थेट देशाच्या राष्ट्रपतींना साकडे घातले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातून ५० हजार पत्र पाठविली जाणारआधी अंतर्गत रेल्वे व्यवस्था मजबुत करण्याची केली मागणी

ठाणे - बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असतांना आता महाराष्ट्र नविनर्माण सेनेने थेट भारताच्या राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प नको यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेट येथील पोस्ट आॅफिसबाहेर पत्रपेटीमध्ये रांग लावून पत्र पोस्ट केले. ठाण्यातून राष्ट्रपतींना ५० हजारांपेक्षा जास्त पत्र पाठवून महाराष्ट्रात हा प्रकल्प नको अशी विनंती त्यांना करण्यात येणार असून यासाठी रेल्वे स्थानक आणि बसस्थाकावर ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.           मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनला महाराष्ट्र नविनर्माण सेनेचा आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात येत असून जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व्हेला देखील यापूर्वी मनसेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. मनसेचा विरोध डावलून शासनाच्या वतीने मोजणीचे काम सुरूच असल्याने अखेर राष्ट्रपतींना याबाबत मनसेच्या वतीने साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे त्या रेल्वेचा विकास करण्याची विनंती केली आहे. देशातील १२५ करोड जनता अंतर्गत रेल्वेवर अवलंबून आहे. मात्र मूठभर श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवला जात आहे. दरवर्षी अपघातामध्ये हजारो नागरीक मरण पावतात. तर काही नागरिकांना कायमचे अपंगत्व येते. मुंबईमध्ये तर रेल्वेचा प्रवास अतिशय जीवघेणा झाला आहे. आपल्या पत्रामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे देखील उदाहरण दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी रेल्वे फाटक नसल्यामुळे काही शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अंतर्गत रेल्वेमध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी काही श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनवर करोडो रु पये खर्च करणे कितपत योग्य आहे असा सवाल या पत्रामध्ये मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.        देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही रेल्वे सेवा पोहचलेली नाही. त्यामुळे आधी ही अंतर्गत रेल्वे सेवा सुधारावी आणि बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आम्ही पत्रामध्ये केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. राष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रकल्प नको म्हणून पत्र पाठवत आहोत. अजूनही ५० हजार पत्र पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासन याबाबत काही ठोस पावले उचलत नसले तरी मनसे बुलेट ट्रेनला कायम विरोध करत राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेrailwayरेल्वे