शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीने सरकारचे पायपुसणे केलेय, 105 आमदार असूनही भाजपवर काय ही वेळ; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:14 IST

Sanjay Raut Latest News: राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी जाणार, एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार?  इंडिया अलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. 

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का ? ते पाहावे लागेल. सरकार बदलत आहे, राष्ट्रपती शासन लागत आहे, काही होऊ शकते. मोदी येणार, साईबाबांचे दर्शन घेणार, भाषण करणार, स्वतः ते एक बाबा आहेत, भाजप म्हणजे भाषण माफिया. त्यापासून महाराष्ट्राला सुटका दिली पाहिजे. या बेकायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मात्र, यावर कुठलाही तोडगा सरकारने काढलेला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार. या अगोदर देखील मी म्हणलो होतो की,  जरांगे यांना मोदींसमोर बसवले पाहिजे, ज्या काही मागण्या आहेत, त्या समोर बसून सांगितले पाहिजे, असे राऊत म्हणाले.महाराष्ट्रात जो जुगार ते हरत आहेत, एका नैराश्यातून ते महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना वारंवार बोलवावे लागत आहे. देशाचे पंतप्रधान आहेत, ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून कुठेही जाऊ शकतात, असा टोला राऊतांनी मोदींना लगावला.

वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहे. या सरकारचे दिल्लीने पायपुसणे केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावे लागते. मंत्रिमंडळाचा विस्तार राहिला बाजूला, विकास राहिला बाजूला. आम्ही गुलाम आहोत, हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही त्यांच्यावरती टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्ली चरणी आहे, अशी टीका राऊतांनी शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर केली. 

भाजपकडे 105 चा आकडा असून काय वेळ आली आहे? हाजी हाजी करावी लागत आहे. बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी जाणार, एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार?  इंडिया अलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. 

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावे. यापूर्वी एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास लोक उत्स्फूर्तपणे जात होते. मात्र, आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. हे भाजपने स्वीकारायला हवे. कोणीही त्या कार्यक्रमाला सरकारी गाडीतून जाणार नाही.  त्या गाड्यांमध्ये बसायला कोणी तयार नाही. गर्दी जमवायचा तो प्रयत्न आहे. परंतू, लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या अशी टीका देखील राऊत यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस