शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

दिल्लीने सरकारचे पायपुसणे केलेय, 105 आमदार असूनही भाजपवर काय ही वेळ; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:14 IST

Sanjay Raut Latest News: राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी जाणार, एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार?  इंडिया अलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. 

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का ? ते पाहावे लागेल. सरकार बदलत आहे, राष्ट्रपती शासन लागत आहे, काही होऊ शकते. मोदी येणार, साईबाबांचे दर्शन घेणार, भाषण करणार, स्वतः ते एक बाबा आहेत, भाजप म्हणजे भाषण माफिया. त्यापासून महाराष्ट्राला सुटका दिली पाहिजे. या बेकायदेशीर सरकारच्या मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मात्र, यावर कुठलाही तोडगा सरकारने काढलेला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार. या अगोदर देखील मी म्हणलो होतो की,  जरांगे यांना मोदींसमोर बसवले पाहिजे, ज्या काही मागण्या आहेत, त्या समोर बसून सांगितले पाहिजे, असे राऊत म्हणाले.महाराष्ट्रात जो जुगार ते हरत आहेत, एका नैराश्यातून ते महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना वारंवार बोलवावे लागत आहे. देशाचे पंतप्रधान आहेत, ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून कुठेही जाऊ शकतात, असा टोला राऊतांनी मोदींना लगावला.

वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहे. या सरकारचे दिल्लीने पायपुसणे केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले. चहा पिऊ का? पाणी पिऊ का? हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावे लागते. मंत्रिमंडळाचा विस्तार राहिला बाजूला, विकास राहिला बाजूला. आम्ही गुलाम आहोत, हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही त्यांच्यावरती टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्ली चरणी आहे, अशी टीका राऊतांनी शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर केली. 

भाजपकडे 105 चा आकडा असून काय वेळ आली आहे? हाजी हाजी करावी लागत आहे. बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी जाणार, एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार?  इंडिया अलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. 

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावे. यापूर्वी एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास लोक उत्स्फूर्तपणे जात होते. मात्र, आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहेत. हे भाजपने स्वीकारायला हवे. कोणीही त्या कार्यक्रमाला सरकारी गाडीतून जाणार नाही.  त्या गाड्यांमध्ये बसायला कोणी तयार नाही. गर्दी जमवायचा तो प्रयत्न आहे. परंतू, लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या अशी टीका देखील राऊत यांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस