शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 13:03 IST

दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. 

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील कदाचित शिवसेना ठरवेल.पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. निवडणुकांमधूनच लोकांचं कौल मिळत असतो. त्याचा कौल आता मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांच्या मनात काय आहे, हे मतपेटीतून दिसेल. राजकारणात ओहोटी आणि भरती सुरूच असते. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे. परंतु सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील शिवसेना ठरवेल. पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे.देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकShiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब