शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Delhi Election Results: भविष्यात नरेंद्र मोदींना पर्याय कोण?, शिवसेना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 13:03 IST

दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. 

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता मोदींना पर्याय कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आपला नाकारण्याचं दिल्लीकरांना मोदींनी केलेलं आवाहन जनतेनं झिडकारलं आहे. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपाला कोंडीत पकडण्याची संधी साधली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांना मोदींना भविष्यात पर्याय कोण असं विचारलं असता सूचक विधान केलं आहे. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील कदाचित शिवसेना ठरवेल.पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. निवडणुकांमधूनच लोकांचं कौल मिळत असतो. त्याचा कौल आता मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांच्या मनात काय आहे, हे मतपेटीतून दिसेल. राजकारणात ओहोटी आणि भरती सुरूच असते. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे. परंतु सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. मोदींना पर्याय कोण असेल ते काळ आणि वेळच ठरवेल. शिवसेनेनं पर्याय दिला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. तसाच देशाचा पर्यायदेखील शिवसेना ठरवेल. पुढच्या निवडणुकीत आणखी चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत देशाचा कल समजेल. आपच्या विकासावरती दिल्लीकरांनी विश्वास दाखवलेला आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे.देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकShiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब