शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:30 IST

तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली.

 - स्वप्नील कुलकर्णी

मुंबई : नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन सर्वार्थाने साहित्य संमेलनाच्या परंपरेतील ‘अभिजात’ संमेलन ठरेल, असा विश्वास माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला. तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली. त्यामुळे या दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संमेलनाबद्दल बोलताना मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी सांगितले की, मराठीला अभिजात दर्जा मिळणं हीच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

यंदाच्या संमेलनात वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य कट्टा, मुलाखती, परिसंवादाबरोबर अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा ‘मधुरव’ कार्यक्रमदेखील होणार आहेत. सध्या कार्यक्रम पत्रिका आणि निमंत्रण पत्रिकेचे काम सुरू असून, त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी अभिनंदनाचा ठराव९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोट्यवधी मराठी रसिकांच्यावतीने अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे या अभिनंदनाचा ठराव मांडणार आहेत.

साहित्य संमेलनांमधून मराठी अस्मिता दिसून येते. साहित्य संमेलने ही मराठी समाजाचा ‘वाङ्मयीन उत्सव’ आहे. या साहित्याच्या उत्सवाला लोक जात-धर्म विसरून येत असतात आणि भविष्यातही येतील. या संमेलनाला मराठी भाषेची ‘अभिजात’रूपी समृद्ध आणि सर्वांनी केलेल्या प्रयत्नांची किनार मिळाली आहे. हे संमेलनदेखील अभूतपूर्व होईल, याचा विश्वास वाटतो.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन