शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:30 IST

तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली.

 - स्वप्नील कुलकर्णी

मुंबई : नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन सर्वार्थाने साहित्य संमेलनाच्या परंपरेतील ‘अभिजात’ संमेलन ठरेल, असा विश्वास माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला. तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली. त्यामुळे या दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संमेलनाबद्दल बोलताना मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी सांगितले की, मराठीला अभिजात दर्जा मिळणं हीच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे.

यंदाच्या संमेलनात वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काव्य कट्टा, मुलाखती, परिसंवादाबरोबर अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा ‘मधुरव’ कार्यक्रमदेखील होणार आहेत. सध्या कार्यक्रम पत्रिका आणि निमंत्रण पत्रिकेचे काम सुरू असून, त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी अभिनंदनाचा ठराव९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोट्यवधी मराठी रसिकांच्यावतीने अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात येणार आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे या अभिनंदनाचा ठराव मांडणार आहेत.

साहित्य संमेलनांमधून मराठी अस्मिता दिसून येते. साहित्य संमेलने ही मराठी समाजाचा ‘वाङ्मयीन उत्सव’ आहे. या साहित्याच्या उत्सवाला लोक जात-धर्म विसरून येत असतात आणि भविष्यातही येतील. या संमेलनाला मराठी भाषेची ‘अभिजात’रूपी समृद्ध आणि सर्वांनी केलेल्या प्रयत्नांची किनार मिळाली आहे. हे संमेलनदेखील अभूतपूर्व होईल, याचा विश्वास वाटतो.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन