शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने जिजाऊ-शिवरायांच्या स्वप्नाचा चुराडा केला, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 16:17 IST

शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार.

सिंदखेड राजा (बुलडाणा) : शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. त्यांना फक्त मलाई खायला पाहिजे, अशा शब्दात आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली.

राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ४२० व्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाच्या वतीने मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. जातीयवादाच्या राजकारणामुळे आज महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. सध्याच्या भाजप सरकराने हेच केले असून माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रिबाई फुले आणि महात्मा फुले यांची स्वप्ने शाळा बंद करून त्यांचा भंग केला आहे, असे केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले. तीन वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथे शाळांचा कायापालट आम्ही केला असून ३०० नवीन शाळा निर्माण केल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग पूल, जिम, हाँकी मैदाने निर्माण केली आहेत. अन्य शाळांच्या तुलनेत दहा टक्के  निकालही या सुविधांमुळे वाढला आहे. ख-या अर्थाने आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केले असल्याचा दावा त्यांनी केला. ४० हजार करोडचे बजेट दिल्ली सरकारचे आहे. ते जर सरकारी शाळा चालवू शकते तर तीन लाख करोडचे बजेट असलेल्या महाराष्ट्राला सरकारी शाळा चालवणे का जमू नये. कारण त्यांना पैसा खायचा आहे. महाराष्ट्रात सध्या घोटाळे समोर येत आहेत. दिल्लीत जनतेने अर्थात रयतेने काँग्रेस, भाजपलाही सत्तेतून दूर हाकलून सामान्य मानसाचे अरथात आम आदमीची सत्ता प्रस्तापीत केली. त्यामुळेच मोफत आरोग्य सुविधा, देशात सर्वात स्वस्त वीज दिल्लीमध्ये उपलब्ध करून देऊ शकलो असेही केजरीवाल म्हणाले.

भाजप हा दंगेखोरांचा पक्ष-भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. देशद्रोही, गद्दारांचा या पक्षात समावेश आहे. पाकिस्तान गत ७० वर्षांपासून भारतात अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्या देशाला जे ७० वर्षांत जमले नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात करून दाखविले. या सरकारच्या काळात देशात अराजकता माजली असून, जातीय दंगली वाढल्या आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचा संदर्भ देताना ‘जातीय दंगली घडवा आणि राज्य करा’ हेच धोरण या सरकारचे असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा घटनेचा जाहीर निषेधही केला.

या कार्यक्रमास दिल्लीचे मंत्री राजेंद्र गौतम, आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शरमा मेनन, सिंचन घोटाळा काढणारे विजय पांढरे, राहूल चव्हाण, देवेंद्र वानखेडे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, बुलडाणा जिल्हा प्रभारी संयोजक सुनील मोरे, लक्ष्मण कोल्हे, अनिल पटेल, अजिंक्य शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालbuldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाBJPभाजपा