शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेसचा घोळ पाहून उद्धव ठाकरे हताश, एका वाक्यात मांडली उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:26 IST

काही खात्यांसाठी अजूनही आग्रह; मंत्री, राज्यमंत्री अस्वस्थ

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता पाच दिवस उलटले असले, तरी अद्याप खातेवाटप मात्र झालेले नाही. काही खात्यांबाबत काँग्रेस नेते अद्यापही आग्रही असल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती आहे. मात्र, लांबत चाललेल्या या खातेवाटपामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असल्याचे समजते. इतके दिवस खातेवाटप रेंगाळल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे.मंत्री व राज्यमंत्र्यांना आपल्याला कोणते खाते मिळणार, हे समजू शकलेले नाही. खात्याविना मंत्रालयात बसायचे कसे, लोकांना भेटायचे कसे, कोणत्या अधिकाऱ्यांसह बैठका घ्यायच्या आणि त्यांना सूचना तरी काय द्यायच्या, असा प्रश्न या मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पडला आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वीच तिन्ही पक्षांकडे कोणती खाती असतील, हे निश्चत झाले आहे. खातेवाटप झालेले आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे कोणती खाती असतील, याची माहिती प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वणुगोपाल यांना आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष हे खातेवाटप झाले होते. असे असताना काँग्रेसचे मंत्री दुसºया खात्यासाठी का आग्रही आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिवसेनेने मात्र अतिशय सामंजस्याची भूमिका घेत, त्यांच्या वाट्याला आलेली सांस्कृतिक कार्य व बंदरे विकास ही दोन खाती काँग्रेस पक्षाला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही काँग्रेस नेते आणखी काही खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘आता कुठे तरी हे थांबवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत वादावादी झाल्याचे वृत्त उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले आहे.ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्रीज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात येणार आहे. मात्र काही जिल्ह्यांबाबत निर्णय बाकी आहे. लवकरच खाते वाटप होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा