शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Deepali Chavan Suicide Case: रेड्डीला सहआरोपी करा, काळी बाजू समोर येईल - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 17:31 IST

Deepali Chavan Suicide Case: याप्रकरणी रेड्डी यांचे निलंबन करून थांबू नका, त्याला सहआरोपी केल्यास या प्रकणातील काळी बाजू समोर येईल. त्यामुळे या प्रकरणात रेड्डीला सहआरोपी करण्याची मागणी वंचितने केली आहे. 

ठळक मुद्दे१०० कोटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

अमरावती : हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा तपास हा वरवर केला जात आहे. त्यांनी ज्यांच्या संदर्भात चौकशी मागितली होती, अशी प्रकरणे बाहेर काढा, त्याचे धागेदारे थेट मेळघाटातील वाघ का कमी होतात? सागाची तस्करी का सुरू आहे? इथ पर्यंत पोहचतील, असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. (Deepali Chavan Suicide Case: Make Reddy a co-accused, the dark side will come forward - Prakash Ambedkar)

दीपाली चव्हाण यांच्यावर दोन वेळा ॲट्रासिटीचे गुन्हे दाखल झाले, त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला. या गुन्ह्यातील फिर्यादी कोण आहेत. त्यांची आर्थिक स्थिती काय? याचा तपास करून सत्य राज्य सरकारने जनतेसमोर आणावे. राज्य सरकारने आठ दिवसांत या दृष्टीने माहिती समोर न आणल्यास वंचितच्या नेत्या प्रा. निशा शेडे या प्रकरणातील सत्य बाहेर आणतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तसेच, याप्रकरणी रेड्डी यांचे निलंबन करून थांबू नका, त्याला सहआरोपी केल्यास या प्रकणातील काळी बाजू समोर येईल. त्यामुळे या प्रकरणात रेड्डीला सहआरोपी करण्याची मागणी वंचितने केली आहे. 

(‘दिपाली चव्हाण यांना न्याय द्या...’ वनखात्यात संतापाची लाट; महानिरिक्षकांना दिले निवेदन)

याचबरोबर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. वाझे व परमवीर प्रकरणात १०० कोटीमध्ये कोणाचा हिस्सा होता. महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाला किती वाटा दिला जात होता हे समोर आणा. शरद पवारांच्या भेटीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे साऱ्याच गोष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत, असे म्हणतात. त्यामुळे या १०० कोटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जर वाटा नसेल तर भाजपाने त्या भेटीमधील सत्य बाहेर सांगितले पाहिजे, असेही म्हटले आहे.

याशिवाय, फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल सार्वजनिक करावा. मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी असे करणे आवश्यक आहे. अन्यथा या प्रकणात मुख्यमंत्री कार्यालयाचाही सहभाग असावा अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरforest departmentवनविभाग