शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Maharashtra Political Crisis: “शरद पवारांबद्दल अपशब्द काढला नाही, चुकीचे बोललो असेल तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:55 IST

Maharashtra Political Crisis: शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केली आणि भाजपसह नवे सरकार स्थापन केले. बंडखोरी का केली, यापुढची भूमिका काय, हे सर्वांना माहिती होण्यासाठी शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे प्रवक्तेपदाची धुरा देण्यात आली. यानंतर वेळोवेळी माध्यमांसमोर येऊन केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, अलीकडेच जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहभाग होता, असा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली होती. यानंतर आता दीपक केसरकर यांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागितली आहे. 

आतापर्यंत शरद पवारांबद्दल एकही अपशब्द केलेला नाही. आतापर्यंत केवळ घडलेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला होता. चुकीचे वाक्य कधीच नाही. मात्र, असे घडले असले तरी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आवश्यकता भासल्यास शरद पवार यांच्या घरी जाऊनही भेट घेईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा

बंडादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे सांगणारे दीपक केसरकर यांनी, शरद पवार एक ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही केसरकर म्हणाले आहेत. तसेच नारायण राणेंच्या मुलाने ट्वीट केले की उद्धव ठाकरेंबद्दल एवढे प्रेम असेल तर मी मातोश्रीवर भांडी घासावी. हा माझा अपमान आहे. यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या एकाही शिवसैनिकाला निषेध करावासा वाटला नाही, असे केसरकर म्हणाले. 

दरम्यान, राणेंची मुले कशी बोलतात याची काळजी घेण्याची जबाबदारी नारायण राणेंची आहे. नारायण राणेंशी माझा वाद नाही, त्याचे कार्यकर्ते जे वागतात त्यावर आक्षेप आहे. राणे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी जर राणेंसोबत काम करायचं असेल तर मी प्रत्यक्ष राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलेन. कारण तेवढा मी सिनिअर आहे. वयाने सिनिअर आहे, जवळ जवळ राणेंच्या वयाचा आहे. नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. त्या प्रकारे त्यांचे खालचे कार्यकर्ते वागतात, त्या कार्यपद्धतीवर माझा आक्षेप आहे. ज्याक्षणी कार्यपद्धती सुधारेल, माझा काहीच वाद राहणार नाही. नारायण राणे यांच्यातील मॅचुरीटी अनेक वर्ष काम केल्यामुळे आहे. ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुणाशी बोलावे असे माझे मत नाही, असे केसरकरांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDeepak Kesarkarदीपक केसरकर Sharad Pawarशरद पवार