शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलू नका म्हणणाऱ्या दीपक केसरकरांचीच ठाकरेंवर  टीका, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:02 IST

Deepak Kesarkar Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र आता दीपक केसरकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंड करत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी शिवसेनेचा वेगळा गट निर्माण केला आहे. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांना १२ खासदारांसह अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी साथ दिली आहे. दरम्यान, या बंडखोरांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र आता दीपक केसरकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दीपक केसरकर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की, मोदींच आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं सुरू होतं. मात्र १२ आमदारांचं निलंबन झाल्यानंतर हे बोलणं थांबलं हे खरं आहे का, या प्रश्नासह मी तीन प्रश्न विचारले होते मात्र मी विचारलेल्या तीन प्रश्नांपैकी एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेषत: शिवसैनिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आज ज्या काही भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण आज जी व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनीच मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून वचन दिलं होतं. मात्र बाळासाहेब दिलेलं आश्वासन पूर्ण करायचं. तुम्ही आश्वासन पूर्ण केलं नाहीत. उलट एकनाथ शिंदेच तुमच्याकडे आले. त्यांनी तुम्हाला सांगितलं की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, मात्र आम्हाला हिंदुत्वासोबत जायचं आहे. त्यावेळी तुम्ही त्यांचं का ऐकला नाहीत. तसेच हिंदुत्वासोबत का गेला नाहीत, असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.

आज या राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याल द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे. २०१४ मध्ये सरकार स्थापन झालं, तेव्हापासून रोज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद व्हायची. रोज दिल्लीवर टीका व्हायची. तरीही आपलं राज्य सुरळीत चालावं, अशी तुमची अपेक्षा होती. ते जे घडत होतं त्याला कोण जबाबदार होता. रोज सकाळी कोण बोलतं हे राज्याला माहिती आहे. ते बोलत असताना ज्या पक्षासोबत राज्य करतोय. त्याच्याशी चांगले संबंध राहिले पाहिजेत. राज्य आणि केंद्राचे संबंध चांगले राहिले पाहिजेत. तर राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो. सामान्यांना दिलासा मिळू शकतो, याचा विचार केला गेला नाही,. असे दीपक केसरकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कालपर्यंत तुम्ही सांगत होता की लोकांच्या बांधापर्यंत चला. मात्र आता आपल्या कार्यकर्त्यांना बांधापर्यंत जायला सांगून त्यांना पंचनाम्यामध्ये मदत करायला का सांगत नाही. त्याच्याऐवजी राज्यात राजकारण सुरू आहे. प्रत्येकाला हिणवण्याचं काम सुरू आहे. आमच्या एका खासदारांच्या घरावर मोर्चा काढला. तुम्हाला एखाद्याच्या घरावर जाण्याचा अधिकार कुणी दिला. तुम्हाला वाटलं तर सभा घ्या, जनतेशी बोला. कुणाच्या घरावर चाल करून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आता प्रवक्त्यांची भाषा पुन्हा घसरू लागली आहे. लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे. पक्षप्रमुख आजारी असताना कटकारस्थान झालेलंच नव्हतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहिजे. तुम्हाला भेटून वारंवार आघाडी तोडण्याबाबत सांगितलं होतं, त्यात काही कटकारस्थान होतं का? शिवसेना वाचवण्यासाठी तर ही आघाडी बनता कामा नये. तसेच  शिवसेनेचं  मुंबई हे हृदय आहे. त्यावेळी तुम्ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी तुम्ही मोदींशी बोलणी का केली नाही. तुमची बोलणी जर महाराष्ट्राच्या सत्तेसाठी असतील तर मग मुंबईचा विचार कुणी करायचा. मुंबईचं अस्तित्व, मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेने टिकवलंय, म्हणून आम्ही शिवसेनेत आलो. आज तुम्ही मुंबईत दिसायला लागलात. शाखांशाखांमध्ये फिरायला लागलात, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना