शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलू नका म्हणणाऱ्या दीपक केसरकरांचीच ठाकरेंवर  टीका, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:02 IST

Deepak Kesarkar Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र आता दीपक केसरकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंड करत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी शिवसेनेचा वेगळा गट निर्माण केला आहे. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांना १२ खासदारांसह अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी साथ दिली आहे. दरम्यान, या बंडखोरांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतला होता. मात्र आता दीपक केसरकर यांनीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दीपक केसरकर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की, मोदींच आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं सुरू होतं. मात्र १२ आमदारांचं निलंबन झाल्यानंतर हे बोलणं थांबलं हे खरं आहे का, या प्रश्नासह मी तीन प्रश्न विचारले होते मात्र मी विचारलेल्या तीन प्रश्नांपैकी एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. हे महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेषत: शिवसैनिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आज ज्या काही भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण आज जी व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंनीच मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून वचन दिलं होतं. मात्र बाळासाहेब दिलेलं आश्वासन पूर्ण करायचं. तुम्ही आश्वासन पूर्ण केलं नाहीत. उलट एकनाथ शिंदेच तुमच्याकडे आले. त्यांनी तुम्हाला सांगितलं की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, मात्र आम्हाला हिंदुत्वासोबत जायचं आहे. त्यावेळी तुम्ही त्यांचं का ऐकला नाहीत. तसेच हिंदुत्वासोबत का गेला नाहीत, असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.

आज या राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याल द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे. २०१४ मध्ये सरकार स्थापन झालं, तेव्हापासून रोज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद व्हायची. रोज दिल्लीवर टीका व्हायची. तरीही आपलं राज्य सुरळीत चालावं, अशी तुमची अपेक्षा होती. ते जे घडत होतं त्याला कोण जबाबदार होता. रोज सकाळी कोण बोलतं हे राज्याला माहिती आहे. ते बोलत असताना ज्या पक्षासोबत राज्य करतोय. त्याच्याशी चांगले संबंध राहिले पाहिजेत. राज्य आणि केंद्राचे संबंध चांगले राहिले पाहिजेत. तर राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो. सामान्यांना दिलासा मिळू शकतो, याचा विचार केला गेला नाही,. असे दीपक केसरकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कालपर्यंत तुम्ही सांगत होता की लोकांच्या बांधापर्यंत चला. मात्र आता आपल्या कार्यकर्त्यांना बांधापर्यंत जायला सांगून त्यांना पंचनाम्यामध्ये मदत करायला का सांगत नाही. त्याच्याऐवजी राज्यात राजकारण सुरू आहे. प्रत्येकाला हिणवण्याचं काम सुरू आहे. आमच्या एका खासदारांच्या घरावर मोर्चा काढला. तुम्हाला एखाद्याच्या घरावर जाण्याचा अधिकार कुणी दिला. तुम्हाला वाटलं तर सभा घ्या, जनतेशी बोला. कुणाच्या घरावर चाल करून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आता प्रवक्त्यांची भाषा पुन्हा घसरू लागली आहे. लोकांना रडवायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे. पक्षप्रमुख आजारी असताना कटकारस्थान झालेलंच नव्हतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलं पाहिजे. तुम्हाला भेटून वारंवार आघाडी तोडण्याबाबत सांगितलं होतं, त्यात काही कटकारस्थान होतं का? शिवसेना वाचवण्यासाठी तर ही आघाडी बनता कामा नये. तसेच  शिवसेनेचं  मुंबई हे हृदय आहे. त्यावेळी तुम्ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी तुम्ही मोदींशी बोलणी का केली नाही. तुमची बोलणी जर महाराष्ट्राच्या सत्तेसाठी असतील तर मग मुंबईचा विचार कुणी करायचा. मुंबईचं अस्तित्व, मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व शिवसेनेने टिकवलंय, म्हणून आम्ही शिवसेनेत आलो. आज तुम्ही मुंबईत दिसायला लागलात. शाखांशाखांमध्ये फिरायला लागलात, असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना