शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उत्पादन कमी तरीही कांद्याचे दर निम्यावर : गतवर्षीपेक्षा क्विंटलमागे १५०० रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:53 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे.

ठळक मुद्देकांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहेतरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.

-राजाराम लोंढे-

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे. क्विंटलमागे दीड हजार रुपयांची घसरण झाली असून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

नाशिक परिसरात कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने सहाजिकच तेथील बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते; पण कोल्हापुरातील उत्पादित किलोही कांदा बाजार समितीत न येता, राज्यातील दुसºया क्रमांकाची उलाढाल कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत होते. दरवर्षी सरासरी २५ लाख कांदा पिशव्यांची आवक बाजार समितीत होते. शंभर-सव्वाशे किलोमीटरची बाजारपेठ सोडून तीनशे-चारशे किलोमीटरवर माल येण्यामागे येथील बाजारातील पारदर्शकताच कारणीभूत आहे. राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत येथील दर नेहमीच चढे राहिले आहेत. पण यंदा कांद्याच्या दरात एकदमच घसरण झाल्याने शेतकºयांची अस्वस्थता वाढली आहे.

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद या प्रमुख जिल्ह्यांत कांद्याचे रब्बी व खरीप हंगामात घेतात. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा खरिपाचा आहे. यंदा पाऊस कमी झाला त्यात कांद्याला पोषक असे वातावरण नसल्याने बारीक कांदा तयार झाला. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९३ हजार क्विंटल कांद्याची आवक राहिली पण दर प्रतिक्विंटल ५५०० रुपयांपर्यंत होता. यंदा ९० हजार क्विंटल आवक होऊनही ४०० ते २००० रुपयांपर्यंत दर राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.रब्बी हंगामातील कांदाच चाळीत!रब्बी हंगामातील कांद्याची लागवड नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यानंतर साडेतीन महिन्यांने तो कांदा बाजारात येतो. या कांद्यात पाण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने तो टिकाऊ असतो. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा सहा-सात महिने चाळीत ठेवला तर तो अधिक मुरतो.दोन महिन्यांने दर तेजीतखरीप बरोबरच पाणीटंचाईमुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमालीचे घटणार आहे. रब्बीचा कांदा चाळीत न ठेवता थेट शिवारातून बाजारात येणार आहे. त्यामुळे आता जरी कांद्याचे दर घसरले असले तरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.गेल्या चार वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील आवक व दरदाम-महिना आवक क्विंटल किमान दर कमाल दर सरासरी दर प्रतिक्विंटलनोव्हेंबर २०१५ १ लाख ४० हजार ४५५ ५०० ५५०० १९००नोव्हेंबर २०१६ १ लाख १७ हजार ८३० १५० १५०० ७००नोव्हेंबर २०१७ ९३ हजार ६५६ १००० ५५०० २५००नोव्हेंबर २०१८ ९० हजार ३७८ ४०० २००० १००० 

पावसामुळे कांदा बारीक तयार झाला हे जरी खरे असले तरी अपेक्षेपेक्षा जादा दर घसरल्याने अडचणीत आलो आहे. सध्या तीन ते चार रुपयांनी कांदा विकून घरी मोकळे गोणपाटच घेऊन जावे लागत आहे. किमान २५ ते ३० रुपये दर मिळाला पाहिजे.- अरुण पवार (कांदा उत्पादक शेतकरी, मोहोळ)

टॅग्स :MarketबाजारMONEYपैसाbusinessव्यवसायFarmerशेतकरी