शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन कमी तरीही कांद्याचे दर निम्यावर : गतवर्षीपेक्षा क्विंटलमागे १५०० रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:53 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे.

ठळक मुद्देकांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहेतरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.

-राजाराम लोंढे-

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे. क्विंटलमागे दीड हजार रुपयांची घसरण झाली असून कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

नाशिक परिसरात कांद्याचे उत्पादन जास्त असल्याने सहाजिकच तेथील बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असते; पण कोल्हापुरातील उत्पादित किलोही कांदा बाजार समितीत न येता, राज्यातील दुसºया क्रमांकाची उलाढाल कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत होते. दरवर्षी सरासरी २५ लाख कांदा पिशव्यांची आवक बाजार समितीत होते. शंभर-सव्वाशे किलोमीटरची बाजारपेठ सोडून तीनशे-चारशे किलोमीटरवर माल येण्यामागे येथील बाजारातील पारदर्शकताच कारणीभूत आहे. राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत येथील दर नेहमीच चढे राहिले आहेत. पण यंदा कांद्याच्या दरात एकदमच घसरण झाल्याने शेतकºयांची अस्वस्थता वाढली आहे.

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद या प्रमुख जिल्ह्यांत कांद्याचे रब्बी व खरीप हंगामात घेतात. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा खरिपाचा आहे. यंदा पाऊस कमी झाला त्यात कांद्याला पोषक असे वातावरण नसल्याने बारीक कांदा तयार झाला. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९३ हजार क्विंटल कांद्याची आवक राहिली पण दर प्रतिक्विंटल ५५०० रुपयांपर्यंत होता. यंदा ९० हजार क्विंटल आवक होऊनही ४०० ते २००० रुपयांपर्यंत दर राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.रब्बी हंगामातील कांदाच चाळीत!रब्बी हंगामातील कांद्याची लागवड नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्यानंतर साडेतीन महिन्यांने तो कांदा बाजारात येतो. या कांद्यात पाण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने तो टिकाऊ असतो. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा सहा-सात महिने चाळीत ठेवला तर तो अधिक मुरतो.दोन महिन्यांने दर तेजीतखरीप बरोबरच पाणीटंचाईमुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमालीचे घटणार आहे. रब्बीचा कांदा चाळीत न ठेवता थेट शिवारातून बाजारात येणार आहे. त्यामुळे आता जरी कांद्याचे दर घसरले असले तरी दोन महिन्यांनी दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.गेल्या चार वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील आवक व दरदाम-महिना आवक क्विंटल किमान दर कमाल दर सरासरी दर प्रतिक्विंटलनोव्हेंबर २०१५ १ लाख ४० हजार ४५५ ५०० ५५०० १९००नोव्हेंबर २०१६ १ लाख १७ हजार ८३० १५० १५०० ७००नोव्हेंबर २०१७ ९३ हजार ६५६ १००० ५५०० २५००नोव्हेंबर २०१८ ९० हजार ३७८ ४०० २००० १००० 

पावसामुळे कांदा बारीक तयार झाला हे जरी खरे असले तरी अपेक्षेपेक्षा जादा दर घसरल्याने अडचणीत आलो आहे. सध्या तीन ते चार रुपयांनी कांदा विकून घरी मोकळे गोणपाटच घेऊन जावे लागत आहे. किमान २५ ते ३० रुपये दर मिळाला पाहिजे.- अरुण पवार (कांदा उत्पादक शेतकरी, मोहोळ)

टॅग्स :MarketबाजारMONEYपैसाbusinessव्यवसायFarmerशेतकरी