शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सत्तेसोबत जाण्याचा निर्णय शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेससाठीच अधिक लाभदायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:41 IST

नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या ...

नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या जागा जिंकून आणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत असून सरकार स्थापन्याच्या तयारीला लागले आहेत. या अनोख्या शिवआघाडीचा फायदा तिन्ही पक्षांना होणार असला तरी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.  

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसच्या संघटनाला मरगळ आली होती. परंतु, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्दावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकसभा निवडणूक राफेलच्या मुद्दावर लढवली. मात्र पुलवामा हल्ला आणि राष्ट्रवादाची आलेली लहर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपने मोठा विजय मिळवत स्वबळावर सत्ता मिळवली. त्यानंतर राज्यात काँग्रेसला गळती लागली. 

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष अनेक राज्यात कमकुवत झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसमध्ये थांबण्यासही नेते तयार नव्हते. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यातच काँग्रेसला सत्तेत बसण्याची संधी निर्माण झाली. 

राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मोठ्या पडझडीनंतर मुसंडी मारली. त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा फारशी गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे बहुतांशी आमदार हे त्यांच्या स्वत:च्या बळावर निवडून आले. आता काँग्रेसला सत्तेत जाण्याची संधी मिळाली आहे. सत्ता असली की, इतर निवडणुका जिंकण्यात अडचणी येत नाहीत. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांतून हे दिसून आले. आता राज्यातही काँग्रेसला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेसचा निर्णय राज्य काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.