शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सत्तेसोबत जाण्याचा निर्णय शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेससाठीच अधिक लाभदायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:41 IST

नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या ...

नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या जागा जिंकून आणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत असून सरकार स्थापन्याच्या तयारीला लागले आहेत. या अनोख्या शिवआघाडीचा फायदा तिन्ही पक्षांना होणार असला तरी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.  

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसच्या संघटनाला मरगळ आली होती. परंतु, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्दावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकसभा निवडणूक राफेलच्या मुद्दावर लढवली. मात्र पुलवामा हल्ला आणि राष्ट्रवादाची आलेली लहर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपने मोठा विजय मिळवत स्वबळावर सत्ता मिळवली. त्यानंतर राज्यात काँग्रेसला गळती लागली. 

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष अनेक राज्यात कमकुवत झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसमध्ये थांबण्यासही नेते तयार नव्हते. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यातच काँग्रेसला सत्तेत बसण्याची संधी निर्माण झाली. 

राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मोठ्या पडझडीनंतर मुसंडी मारली. त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा फारशी गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे बहुतांशी आमदार हे त्यांच्या स्वत:च्या बळावर निवडून आले. आता काँग्रेसला सत्तेत जाण्याची संधी मिळाली आहे. सत्ता असली की, इतर निवडणुका जिंकण्यात अडचणी येत नाहीत. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांतून हे दिसून आले. आता राज्यातही काँग्रेसला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेसचा निर्णय राज्य काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.