शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसोबत जाण्याचा निर्णय शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेससाठीच अधिक लाभदायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:41 IST

नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या ...

नवी दिल्ली - भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर राज्यात नवीन समीकरण उदयास येत आहे. निवडणुकीपूर्वी एकमेकांवर टीका करून आपल्या जागा जिंकून आणणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत असून सरकार स्थापन्याच्या तयारीला लागले आहेत. या अनोख्या शिवआघाडीचा फायदा तिन्ही पक्षांना होणार असला तरी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.  

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसच्या संघटनाला मरगळ आली होती. परंतु, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्दावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकसभा निवडणूक राफेलच्या मुद्दावर लढवली. मात्र पुलवामा हल्ला आणि राष्ट्रवादाची आलेली लहर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपने मोठा विजय मिळवत स्वबळावर सत्ता मिळवली. त्यानंतर राज्यात काँग्रेसला गळती लागली. 

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष अनेक राज्यात कमकुवत झाला. महाराष्ट्रात तर काँग्रेसमध्ये थांबण्यासही नेते तयार नव्हते. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्तेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यातच काँग्रेसला सत्तेत बसण्याची संधी निर्माण झाली. 

राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मोठ्या पडझडीनंतर मुसंडी मारली. त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा फारशी गांभीर्याने घेतल्याचे दिसले नाही. काँग्रेसचे बहुतांशी आमदार हे त्यांच्या स्वत:च्या बळावर निवडून आले. आता काँग्रेसला सत्तेत जाण्याची संधी मिळाली आहे. सत्ता असली की, इतर निवडणुका जिंकण्यात अडचणी येत नाहीत. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकांतून हे दिसून आले. आता राज्यातही काँग्रेसला ही संधी मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेसचा निर्णय राज्य काँग्रेसला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.