शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाविद्यालयांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच! ऑनलाइन की ऑफलाइनचा निर्णय आज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:57 IST

मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय बुधवारी घेतला जाणार आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. 

  सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑनलाईन बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विक्सचंद्र रस्तोगी, तंत्र हशिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते.

मुंबईत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढल्याने दहावी, बारावी वगळता शाळांसह, कनिष्ठ महाविद्यालये येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये सुरू ठेवणे कितपत योग्य राहील, याचा अभिप्राय कुलगुरूंनी सादर करावा, अशा सूचना मंत्र्यांनी ३१ डिसेंबर रोजी तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत दिल्या होत्या. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने मंगळवारी तातडीने बैठक बोलावली होती. 

वसतिगृह सुरू करण्याची मागणी, पण ?विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व विद्यापीठांना आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याची सूचना केली आहे. मात्र मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांना याचा विसर पडला आहे. अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत असून वसतिगृह सुरु करण्याची मागणी करीत आहेत. पीएचडी करणाऱ्या तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू नसण्याचा प्रचंड त्रास होत असून यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे. मात्र सद्यस्थितीत वसतिगृह सुरु करण्यासंबंधातील निर्णय कितपत योग्य असेल यावर शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस