शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2017 04:08 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेलीआहे.राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू होताच ३३पैकी पाच प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांची संख्या अवघ्या काही दिवसांत लाखांनी कमी केल्याने कोट्यवधींचा सरकारी निधी हडप करणारी यंत्रणा बँकांच्या पातळीवर काम तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करताना ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले होते. हा आकडा स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी)ने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ज्या शेतकºयाला कर्जमाफी दिली जाणार आहे, त्याची नोंदणी करण्याची कल्पनामांडली.मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी मिळून यात पारदर्शकता आणण्यासाठी काही अटी व शर्ती लागू करत कर्जदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला.निर्माण झालेले प्रश्न-राष्टÑीयीकृत बँकांनीसरकारला दिलेली आकडेवारी अचानक कशी कमी झाली?जुन्या आकडेवारीच्याआधारे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या बँकांनी व्याजापोटी व अन्य कोणत्या गोष्टीसाठी किती रक्कम याआधी घेतली आहे का?89 लाखांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असता तर तो आज कोणाच्या खात्यात जमाझाला असता?जिल्हा सहकारी बँकांच्या खातेदारांची संख्या ३६ लाख, कर्ज पुनर्गठनाचा फायदा मिळणारे १० लाख खातेदार अशी ही संख्या४६ लाखांच्या घरात आहे. एसएलबीसीने सांगितलेल्या ८९ लाखांतून हे ४६ लाख कमी केले तर ती संख्या होते ४३ लाख होते. मात्र७ आॅक्टोबरच्या सायंकाळपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांनी राज्य सरकारला कळविलेली खातेदारांची संख्या २९,६३,८४१ इतकी आहे. याचाच अर्थ १३,३६,१५९ खातेदार शेतकरी गेले कुठे? याचे उत्तर एसएलबीसीकडे नाही.चौकशी करू : सहकारमंत्रीआज आमचे प्राधान्य शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आहे. कोणत्या बँकेने किती खातेदार कमी सांगितले? का सांगितले? या सगळ्याची नंतर चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण गरीब शेतकºयांचे व जनतेचे करातून मिळणारे पैसे कोणालाही हडप करू दिले जाणार नाहीत.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार