शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2017 04:08 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेलीआहे.राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू होताच ३३पैकी पाच प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांची संख्या अवघ्या काही दिवसांत लाखांनी कमी केल्याने कोट्यवधींचा सरकारी निधी हडप करणारी यंत्रणा बँकांच्या पातळीवर काम तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करताना ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले होते. हा आकडा स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी)ने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ज्या शेतकºयाला कर्जमाफी दिली जाणार आहे, त्याची नोंदणी करण्याची कल्पनामांडली.मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी मिळून यात पारदर्शकता आणण्यासाठी काही अटी व शर्ती लागू करत कर्जदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला.निर्माण झालेले प्रश्न-राष्टÑीयीकृत बँकांनीसरकारला दिलेली आकडेवारी अचानक कशी कमी झाली?जुन्या आकडेवारीच्याआधारे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या बँकांनी व्याजापोटी व अन्य कोणत्या गोष्टीसाठी किती रक्कम याआधी घेतली आहे का?89 लाखांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असता तर तो आज कोणाच्या खात्यात जमाझाला असता?जिल्हा सहकारी बँकांच्या खातेदारांची संख्या ३६ लाख, कर्ज पुनर्गठनाचा फायदा मिळणारे १० लाख खातेदार अशी ही संख्या४६ लाखांच्या घरात आहे. एसएलबीसीने सांगितलेल्या ८९ लाखांतून हे ४६ लाख कमी केले तर ती संख्या होते ४३ लाख होते. मात्र७ आॅक्टोबरच्या सायंकाळपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांनी राज्य सरकारला कळविलेली खातेदारांची संख्या २९,६३,८४१ इतकी आहे. याचाच अर्थ १३,३६,१५९ खातेदार शेतकरी गेले कुठे? याचे उत्तर एसएलबीसीकडे नाही.चौकशी करू : सहकारमंत्रीआज आमचे प्राधान्य शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आहे. कोणत्या बँकेने किती खातेदार कमी सांगितले? का सांगितले? या सगळ्याची नंतर चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण गरीब शेतकºयांचे व जनतेचे करातून मिळणारे पैसे कोणालाही हडप करू दिले जाणार नाहीत.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार