शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2017 04:08 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेलीआहे.राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू होताच ३३पैकी पाच प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांची संख्या अवघ्या काही दिवसांत लाखांनी कमी केल्याने कोट्यवधींचा सरकारी निधी हडप करणारी यंत्रणा बँकांच्या पातळीवर काम तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करताना ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले होते. हा आकडा स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी)ने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ज्या शेतकºयाला कर्जमाफी दिली जाणार आहे, त्याची नोंदणी करण्याची कल्पनामांडली.मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी मिळून यात पारदर्शकता आणण्यासाठी काही अटी व शर्ती लागू करत कर्जदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला.निर्माण झालेले प्रश्न-राष्टÑीयीकृत बँकांनीसरकारला दिलेली आकडेवारी अचानक कशी कमी झाली?जुन्या आकडेवारीच्याआधारे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या बँकांनी व्याजापोटी व अन्य कोणत्या गोष्टीसाठी किती रक्कम याआधी घेतली आहे का?89 लाखांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असता तर तो आज कोणाच्या खात्यात जमाझाला असता?जिल्हा सहकारी बँकांच्या खातेदारांची संख्या ३६ लाख, कर्ज पुनर्गठनाचा फायदा मिळणारे १० लाख खातेदार अशी ही संख्या४६ लाखांच्या घरात आहे. एसएलबीसीने सांगितलेल्या ८९ लाखांतून हे ४६ लाख कमी केले तर ती संख्या होते ४३ लाख होते. मात्र७ आॅक्टोबरच्या सायंकाळपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांनी राज्य सरकारला कळविलेली खातेदारांची संख्या २९,६३,८४१ इतकी आहे. याचाच अर्थ १३,३६,१५९ खातेदार शेतकरी गेले कुठे? याचे उत्तर एसएलबीसीकडे नाही.चौकशी करू : सहकारमंत्रीआज आमचे प्राधान्य शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आहे. कोणत्या बँकेने किती खातेदार कमी सांगितले? का सांगितले? या सगळ्याची नंतर चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण गरीब शेतकºयांचे व जनतेचे करातून मिळणारे पैसे कोणालाही हडप करू दिले जाणार नाहीत.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार