शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्जमाफीचे गौडबंगाल :१३ लाख शेतकरी गेले कुठे? ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात

By अतुल कुलकर्णी | Updated: October 10, 2017 04:08 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने सरकारला दिलेली ८९ लाख शेतक-यांची आकडेवारीच संशयाच्या भोव-यात सापडली आहे. कारण, याच कमिटीने आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३ लाख ३६ हजारांनी कमी केल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांवर संशयाची सुई रोखली गेलीआहे.राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरू होताच ३३पैकी पाच प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांची संख्या अवघ्या काही दिवसांत लाखांनी कमी केल्याने कोट्यवधींचा सरकारी निधी हडप करणारी यंत्रणा बँकांच्या पातळीवर काम तर करत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करताना ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले होते. हा आकडा स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (एसएलबीसी)ने मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ज्या शेतकºयाला कर्जमाफी दिली जाणार आहे, त्याची नोंदणी करण्याची कल्पनामांडली.मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांनी मिळून यात पारदर्शकता आणण्यासाठी काही अटी व शर्ती लागू करत कर्जदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला.निर्माण झालेले प्रश्न-राष्टÑीयीकृत बँकांनीसरकारला दिलेली आकडेवारी अचानक कशी कमी झाली?जुन्या आकडेवारीच्याआधारे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या बँकांनी व्याजापोटी व अन्य कोणत्या गोष्टीसाठी किती रक्कम याआधी घेतली आहे का?89 लाखांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असता तर तो आज कोणाच्या खात्यात जमाझाला असता?जिल्हा सहकारी बँकांच्या खातेदारांची संख्या ३६ लाख, कर्ज पुनर्गठनाचा फायदा मिळणारे १० लाख खातेदार अशी ही संख्या४६ लाखांच्या घरात आहे. एसएलबीसीने सांगितलेल्या ८९ लाखांतून हे ४६ लाख कमी केले तर ती संख्या होते ४३ लाख होते. मात्र७ आॅक्टोबरच्या सायंकाळपर्यंत राष्टÑीयीकृत बँकांनी राज्य सरकारला कळविलेली खातेदारांची संख्या २९,६३,८४१ इतकी आहे. याचाच अर्थ १३,३६,१५९ खातेदार शेतकरी गेले कुठे? याचे उत्तर एसएलबीसीकडे नाही.चौकशी करू : सहकारमंत्रीआज आमचे प्राधान्य शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे आहे. कोणत्या बँकेने किती खातेदार कमी सांगितले? का सांगितले? या सगळ्याची नंतर चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण गरीब शेतकºयांचे व जनतेचे करातून मिळणारे पैसे कोणालाही हडप करू दिले जाणार नाहीत.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार