शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच -  उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 18:39 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

मुंबई, दि. 14 - गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

''उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार?'', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  शिवाय, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’, असे वादग्रस्त विधान करणा-या उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ यांना पदावरुन हटवण्याचीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

नेमके काय आहे सामना संपादकीय ?उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका वक्तव्यामुळे देशात टीकेची झोड उठवली गेली आहे, पण उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या इस्पितळात ७० बालकांनी तडफडून प्राण सोडले यावर अनेक ‘भोंग्यां’ची वाचा गेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिल्यापासून हुकमत असलेला गोरखपूर जिल्हा आहे. त्या गोरखपुरात बालकांच्या मृत्यूचे हे तांडव म्हणजे माणुसकीला आणि शासनाला कलंक आहे. इस्पितळातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला व ७० मुलांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीची बिले वेळेत भरली गेली नाहीत. सरकारने बिले थकवली व ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला. हे असे घडले असेल तर उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार? हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन एक दिवसावर आला आहे व लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणाची जय्यत तयारी सुरू असताना उत्तर प्रदेशात बालमृत्यूचे तांडव घडावे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे. केंद्रातील सत्तापरिवर्तनानंतर सामान्य व गोरगरीबांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येतील अशा आशेची किरणे उगवली होती, पण आजही ग्रामीण भागातील सरकारी इस्पितळात धड औषधे नाहीत, सुविधा नाहीत व ऑक्सिजनसारख्या आवश्यक गोष्टी नाहीत. मग बदलले ते काय? चारेक दिवसांत ७० मुले नक्की कशाने मेली यावर दडपादडपीचे प्रकार सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ निर्लज्जपणे सांगतात, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’ या भयंकर विधानाबद्दल या मंत्र्यांना ताबडतोब पदावरून दूर करायला हवे. हे मंत्री काँग्रेसचे किंवा यादवांच्या समाजवादी पक्षाचे असते तर त्यांना एव्हाना सुळावर चढवून राज्यकर्त्यांचे क्रियाकर्मही पूर्ण केले गेले असते. नशीब इतकेच की, ७० मुले मृत झाली हे तरी मान्य केले जात आहे. नाहीतर ‘‘कोण म्हणतेय मुलं मेली? फक्त त्यांचा श्वास बंद पडला आहे आणि त्यांच्या हातापायांच्या हालचाली थांबल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाची भाषणे त्यांच्या कानावर पडताच ही निपचीत पडलेली मुले जागी होतील व भारतमातेचा जयजयकार करतील,’’ असे ‘निवेदन’ एखाद्या शहाण्याने केले तरी आता आश्चर्य वाटणार नाही. ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांना आमचा एक सवाल आहे. मग हा पटकीचा फेरा फक्त गरीबांच्या घरातच का शिरतो? ऑगस्टमध्ये मंत्र्यांच्या व

दबंगांच्या घरात हा पटकीचा फेरा का शिरत नाही? (असे दुर्दैवाने म्हणावे लागते).

आणखी वाचा - गोरखपूर प्रकरणातील दोषींची गय करणार नाही - योगी आदित्यनाथ

अशा दुर्घटना होत असतात, गोरखपूर बालमृत्यूकांडावर अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य 

कारण गरीब हा हतबल आहे, लावारीस बनला आहे व प्रत्येक सरकार त्याला फसवून खुर्च्या मिळवीत आहे. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १४-१५ लाखांची ‘माया’ जमा झाली असती तर या माता-पित्यांना चांगले उपचार मुलांना देता आले असते व औषध, ऑक्सिजनशिवाय पोरांचे तडफडून होणारे मृत्यू पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. गरीबांचे दुःख आणि वेदना राज्यकर्त्यांचे मन अस्वस्थ करीत नाही हेच आमच्या स्वातंत्र्याचे अपयश आहे. ही वेदनाच गरीबांची ‘मन की बात’ आहे, पण ती समजून घेण्याऐवजी त्या वेदनेची खिल्ली उडवली जाते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सांगतात, ऑगस्टमध्ये मुले मरतातच. काय करणार त्या मंत्र्यांना! त्यांना एक सत्य सांगायला हवे. ऑगस्ट महिना हा क्रांतीचा आहे. ९ ऑगस्टला ‘छोडो भारत’ असा नारा देशभक्त लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांना दिला होता आणि १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले हे विसरू नका. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे!

टॅग्स :GorakhpurगोरखपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे