शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोरखपूरच्या इस्पितळातील मुलांचा मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच -  उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 18:39 IST

गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

मुंबई, दि. 14 - गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

''उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार?'', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  शिवाय, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’, असे वादग्रस्त विधान करणा-या उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ यांना पदावरुन हटवण्याचीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

नेमके काय आहे सामना संपादकीय ?उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका वक्तव्यामुळे देशात टीकेची झोड उठवली गेली आहे, पण उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या इस्पितळात ७० बालकांनी तडफडून प्राण सोडले यावर अनेक ‘भोंग्यां’ची वाचा गेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिल्यापासून हुकमत असलेला गोरखपूर जिल्हा आहे. त्या गोरखपुरात बालकांच्या मृत्यूचे हे तांडव म्हणजे माणुसकीला आणि शासनाला कलंक आहे. इस्पितळातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला व ७० मुलांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीची बिले वेळेत भरली गेली नाहीत. सरकारने बिले थकवली व ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला. हे असे घडले असेल तर उत्तर प्रदेशात ७० बालकांचे सामुदायिक हत्याकांड घडले आहे व या हत्याकांडाची जबाबदारी कोण घेणार? हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन एक दिवसावर आला आहे व लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणाची जय्यत तयारी सुरू असताना उत्तर प्रदेशात बालमृत्यूचे तांडव घडावे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे. केंद्रातील सत्तापरिवर्तनानंतर सामान्य व गोरगरीबांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येतील अशा आशेची किरणे उगवली होती, पण आजही ग्रामीण भागातील सरकारी इस्पितळात धड औषधे नाहीत, सुविधा नाहीत व ऑक्सिजनसारख्या आवश्यक गोष्टी नाहीत. मग बदलले ते काय? चारेक दिवसांत ७० मुले नक्की कशाने मेली यावर दडपादडपीचे प्रकार सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ निर्लज्जपणे सांगतात, ‘‘यहां तो अगस्त में बच्चे मरतेही है!’’ या भयंकर विधानाबद्दल या मंत्र्यांना ताबडतोब पदावरून दूर करायला हवे. हे मंत्री काँग्रेसचे किंवा यादवांच्या समाजवादी पक्षाचे असते तर त्यांना एव्हाना सुळावर चढवून राज्यकर्त्यांचे क्रियाकर्मही पूर्ण केले गेले असते. नशीब इतकेच की, ७० मुले मृत झाली हे तरी मान्य केले जात आहे. नाहीतर ‘‘कोण म्हणतेय मुलं मेली? फक्त त्यांचा श्वास बंद पडला आहे आणि त्यांच्या हातापायांच्या हालचाली थांबल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाची भाषणे त्यांच्या कानावर पडताच ही निपचीत पडलेली मुले जागी होतील व भारतमातेचा जयजयकार करतील,’’ असे ‘निवेदन’ एखाद्या शहाण्याने केले तरी आता आश्चर्य वाटणार नाही. ऑगस्ट महिन्यात येथे मुले मरतातच असे सांगणाऱ्यांना आमचा एक सवाल आहे. मग हा पटकीचा फेरा फक्त गरीबांच्या घरातच का शिरतो? ऑगस्टमध्ये मंत्र्यांच्या व

दबंगांच्या घरात हा पटकीचा फेरा का शिरत नाही? (असे दुर्दैवाने म्हणावे लागते).

आणखी वाचा - गोरखपूर प्रकरणातील दोषींची गय करणार नाही - योगी आदित्यनाथ

अशा दुर्घटना होत असतात, गोरखपूर बालमृत्यूकांडावर अमित शाहांचं बेजबाबदार वक्तव्य 

कारण गरीब हा हतबल आहे, लावारीस बनला आहे व प्रत्येक सरकार त्याला फसवून खुर्च्या मिळवीत आहे. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी १४-१५ लाखांची ‘माया’ जमा झाली असती तर या माता-पित्यांना चांगले उपचार मुलांना देता आले असते व औषध, ऑक्सिजनशिवाय पोरांचे तडफडून होणारे मृत्यू पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. गरीबांचे दुःख आणि वेदना राज्यकर्त्यांचे मन अस्वस्थ करीत नाही हेच आमच्या स्वातंत्र्याचे अपयश आहे. ही वेदनाच गरीबांची ‘मन की बात’ आहे, पण ती समजून घेण्याऐवजी त्या वेदनेची खिल्ली उडवली जाते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सांगतात, ऑगस्टमध्ये मुले मरतातच. काय करणार त्या मंत्र्यांना! त्यांना एक सत्य सांगायला हवे. ऑगस्ट महिना हा क्रांतीचा आहे. ९ ऑगस्टला ‘छोडो भारत’ असा नारा देशभक्त लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांना दिला होता आणि १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळाले हे विसरू नका. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे!

टॅग्स :GorakhpurगोरखपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे