शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

By admin | Updated: July 16, 2017 14:13 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगर वॉर्ड नं. 1 येथील लक्ष्मीनगर येथे टेकडीवरील घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतउल्हासनगर, दि. 16 - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनगर वॉर्ड नं. 1 येथील लक्ष्मीनगर येथे टेकडीवरील घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत चार जण जखमी आहेत. सैफुद्दीन खान आणि इस्लाम शेख हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत. शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, मागील दोन दिवसांपासून विदर्भातही पाऊसधारा सुरू झाल्या असून गडचिरोलीत अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सरींवर सरी पडत आहेत. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार कायम आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. मराठवाड्यात पाऊस नसला तरी जायकवाडीतील नाथसागरात पाणीसाठा होऊ लागला आहे. मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. मुंबईकरांची तहान भागविणारा मोडक सागर तलाव भरुन वाहू लागला आहे. माळशेज घाटात दरडी कोसळत असल्याने पुढील दोन दिवस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून राधानगरीसह पाच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटांपर्यंत गेली असून, आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात संततधार सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. कोकणात मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. 17 आणि 18 जुलै रोजीही सर्वदूर मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस येथील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवरही बंदी घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.