शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

“राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली? आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळे...”; फडणवीस थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:14 IST

Devendra Fadnavis News: मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Devendra Fadnavis News: आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करणे आणि जागावाटप यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार केला असून, भाजपानेही कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ऐतिहासिक फुटीचा लोकसभा निवडणुकांमध्ये कसा परिणाम होऊ शकतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय घडामोडींवर थेट शब्दांत भाष्य केले. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला. मात्र भाजपा हा एकमेव पक्ष होता, ज्याने स्वतंत्र शैली विकसित केली. आता अन्य राजकीय पक्ष हळूहळू स्वतःमध्ये बदल करत आहेत. भाजपाच्या पावलांवर पाऊल टाकत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली?

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट का पडली? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढे आणले आणि नंतर वरिष्ठांना वाटले की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झाले. उद्धव ठाकरेंना वाटले की, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढे आणले पाहिजे. त्याच अनुषंगाने राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, भाजपाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचं असेल तर त्यांनी जरूर यावे. पण स्वतःच्या ताकदीवर यावे. राजकारण स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केले जाते, त्याला घराणेशाहीचे राजकारण म्हणतात. मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४