शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

“राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली? आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळे...”; फडणवीस थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:14 IST

Devendra Fadnavis News: मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Devendra Fadnavis News: आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करणे आणि जागावाटप यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार केला असून, भाजपानेही कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ऐतिहासिक फुटीचा लोकसभा निवडणुकांमध्ये कसा परिणाम होऊ शकतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय घडामोडींवर थेट शब्दांत भाष्य केले. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला. मात्र भाजपा हा एकमेव पक्ष होता, ज्याने स्वतंत्र शैली विकसित केली. आता अन्य राजकीय पक्ष हळूहळू स्वतःमध्ये बदल करत आहेत. भाजपाच्या पावलांवर पाऊल टाकत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली?

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट का पडली? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढे आणले आणि नंतर वरिष्ठांना वाटले की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झाले. उद्धव ठाकरेंना वाटले की, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढे आणले पाहिजे. त्याच अनुषंगाने राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, भाजपाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचं असेल तर त्यांनी जरूर यावे. पण स्वतःच्या ताकदीवर यावे. राजकारण स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केले जाते, त्याला घराणेशाहीचे राजकारण म्हणतात. मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४