शहरं
Join us  
Trending Stories
1
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
2
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
3
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
4
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
5
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
6
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
8
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
9
धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
10
या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
11
बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
12
Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
13
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
14
₹२००० पर्यंत जाणार झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेला स्टॉक; कंपनीत १६% हिस्सा, आज जोरदार तेजी
15
अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट
16
Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
17
लंडनमध्ये राहणाऱ्या अब्जाधीशांना झटका! अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार; भारतात काय निमय?
18
३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo
19
IND vs SA ODI Series : रोहित-विराट मिळून रचणार नवा इतिहास! सचिन-द्रविडचा महारेकॉर्ड पडणार मागे
20
वेळेवर EMI भरूनही CIBIL Score का घसरतो? 'क्रेडिट मिक्स' आणि इतर ४ महत्त्वाची कारणे जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

“दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 18:56 IST

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: हे जिंकले तर ईव्हीएम चांगले, पण पराभव झाला तर मात्र ते वाईट, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपानेही १९५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यामध्ये समावेश नाही. यावरून आता भाजपावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पहिल्या यादीवर भाष्य करताना ईव्हीएमवरूनही टीका केली आहे. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

उद्योगपती, शेतकरी, कामगारांच्यात असंतोष आहे. पण, ईव्हीएमने हे जिंकू शकतात. जर दुर्दैवाने हे ईव्हीएमने हे जिंकले तर देशात मोठा असंतोष पसरेल, मला याची चिंता वाटते. आपण जनतेसोबत आहोत. सुरुवातीच्या काळापासून नितीन गडकरी यांचे नाव ऐकले आहे. भाजपाचे ते निष्ठावन कार्यकर्ते आहेत. त्यांनी रस्त्यांचे मोठे काम केले, अशा व्यक्तींचे पहिल्या यादीत नाव नाही. पण घोटाळा करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचे नाव आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की, उत्तर देण्यालायकही हा मुद्दा राहिलेला नाही. हे जिंकले तर EVM चांगले, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असे यांचे धोरण आहे. आता त्यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल बोलणे सुरू केले आहे. या ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा? आत्तापर्यंत एकही राजकीय पक्ष असे काही करू शकलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, आता गेल्या दहा वर्षात अनेक जुन्या योजनांची नावे बदलली आहेत तसेच आता जुमलाचे नाव गॅरेंटी झाले आहे. आपण सर्व जनतेला भेटत आहोत. सर्व स्तरातील जनता नाराज आहे. यात आपण अंधभक्तांना धरत नाही. त्यांना डोळे असून दृष्टी नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे