शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:47 IST

Maharashtra Politics: दोनवेळा समन्स बजावल्यानंतर जयंत पाटील ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले.

Maharashtra Politics: इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अ‍ॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने दोन वेळा समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जयंत पाटील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. भाजपविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीबाबत प्रतिक्रिया दिली. 

आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. यानंतर आता जयंत पाटील यांना नोटीस देत चौकशीला बोलावण्यात आले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. 

त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल म्हणून...

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांचे काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादे प्रकरण असेल म्हणून त्यांनी जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावले असेल. जर जयंत पाटलांचा या खटल्याशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या देशामध्ये जे कोणी सत्यासोबत उभे आहे किंवा जे कोणी खरे बोलत आहे, किंबहुना जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आहे. हा पॅटर्न देशभरात सर्वत्र सुरू असून कुठेही लोकशाही दिसत नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस