शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

“वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव द्यावे”; देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 11:38 IST

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीला बळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे. अनेकविध मुद्द्यांमध्ये आता स्वातंत्र्यवीर सावकर यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे, वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. देवेंद्र फडणवीसांनी १३ मार्च रोजी यासंदर्भात पत्र लिहिले होते. या पत्रात कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्यात यावे

मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अन्य दोन मागण्या पूर्ण होणार का, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे होत आहेत आणि त्याला तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ही विकास कामे जशी जनसुविधा म्हणून सातत्याने ओळखली जातील, तशीच त्या प्रत्येक कामाच्या निमित्ताने आपल्या महापुरुषांच्या आणि महनीयांच्या आदर्शाचे सुद्धा स्मरण येणाऱ्या पिढ्यांना झाले पाहिजे, ही बाब सुद्धा तितकीच आवश्यक आहे आणि तीच या मागण्यांमागची भूमिका आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर