शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "हिरवी मशाल घेवून 'टोमणे मेळावा' होणार तर..."; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 15:44 IST

PFI च्या मुद्द्यावरूनही उद्धव यांना सुनावलं...

Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: महाराष्ट्रात दसरा मेळाव्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या असताना, देशपातळीवर मात्र PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा विषय गाजतोय. छापे, धाडी आणि अटक सत्रानंतर अखेर केंद्र सरकारने PFI आणि त्याच्याशी संबंधित ८ संघटनांवर बंदी घातली. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपामुळे केंद्र सरकारने PFI वर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. PFI चे जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशीही संबंध आहेत असे अधिसूचनेत म्हटले आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमकपणे बोलतात, पण PFI बद्दल त्यांच्याकडून कोणतेही अधिकृत मत व्यक्त करण्यात आल्यावरून मनसेने त्यांना टोला लगावला.

शिवसेनेच्या शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला जरी उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली असली तरी शिवसेनेत दोन गट पडल्याने गर्दी जमवणे व शक्तीप्रदर्शन करणे क्रमप्राप्तच आहे. अशा वेळी एका वृत्तानुसार, काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनात शिवसैनिकांनी सहभागी झाल्यास, दसरा मेळाव्याला काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहतील असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावरून मनसेचे गजानन काळे यांनी टीका केली आहे.

"नवाब सेनेचा 'टोमणे मेळावा' काँग्रेसच्या जीवावर होणार तर ... बुडत्याला काडीचा आधार ... तरी म्हटलं नवाब सेनाप्रमुख, छोटे नवाब व त्यांच्या सेनेकडून 'पीएफआय'बाबत अधिकृत वक्तव्य अजून का नाही आले ते ... हिरवी मशाल घेवून टोमणे मेळावा होणार तर ...", असा खोचक टोला मनसेचे गजानन काळे यांनी लगावला आहे. मनसे गेल्या काही महिन्यांपासून प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आक्रमक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबद्दल जाहीर आवाज उठवला. ते आंदोलन यशस्वी झाल्याचेही त्यांनी त्यानंतरच्या सभांमध्ये सांगितले. तसेच, PFI वर केंद्र सरकारने कारवाई केल्यानंतर राज यांनी जाहीरपणे गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे