किराणा-भाजीपाल्यासाठी पोलीस दावणीला!

By Admin | Updated: November 1, 2015 00:27 IST2015-11-01T00:27:25+5:302015-11-01T00:27:25+5:30

जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील

Darna police for grocery food! | किराणा-भाजीपाल्यासाठी पोलीस दावणीला!

किराणा-भाजीपाल्यासाठी पोलीस दावणीला!

यवतमाळ : जनतेची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आदी पोलिसांची कर्तव्ये असली, तरी अनेक कर्मचाऱ्यांचा वापर मात्र अधिकाऱ्यांच्या बंगल्यावरील घरगुती कामांसाठी केला जातो. किराणा, दळण, भाजीपाला, मुलांची ने-आण करण्यासाठी त्यांना जुंपले जाते. राज्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट महासंचालकांच्या दरबारात याबाबत निवेदन-पत्राद्वारे तक्रार केली आहे.
राज्यातून आलेल्या पत्रांची दखल घेऊन महासंचालकांतर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) आशुतोष डुम्बरे (मुंबई) यांनी ‘पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी’ असा संदर्भ देऊन विभागाच्या पोलीस प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या शंका निरसनासाठी पोलीस दरबार भरविण्याच्या सूचना केल्या आहेत. समस्या ऐकून त्याचे घेऊन निरसन करण्याचे व योग्य मार्गदर्शन करण्याचे सुचविले आहे.
जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सादरेंच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस दलात वरिष्ठांकडून अधिकारांचा गैरवापर होतो. कर्मचाऱ्यांना नोकरासारखे वागविले जाते. घरगुती, वैयक्तिक कामे करून घेतली जातात. किराणा, भाजीपाला आणणे, पत्नीला ब्युटीपार्लर तसेच सिनेमाला नेऊन सोडणे, मुलांना शाळेत, शिकवणीला नेणे-आणणे, दळण आणणे अशी कामे करुन घेतली जात असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
काही अधिकारी खासगी गाडीने शासकीय कर्मचाऱ्यांकडून ही कामे करून घेतात. ही कामे करताना लाज वाटते. मात्र नाईलाज असतो. कारण अधिकारी नाराज झाल्यास कसुरी रिपोर्ट पाठविणे, दंड आकारणे, सेवा पुस्तिकेत (सीआर) चुकीचा शेरा खराब लिहिणे आदी कारवाईला सामोरे जावे लागते. उपरोक्त वागणुकीचा ऊहापोह पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे महासंचालकांकडे केला आहे. (प्रतिनिधी)

‘कन्व्हिक्शन रेट’वरून छळ?
न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण (कन्व्हिक्शन रेट) वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यातून गुन्ह्यांची कागदपत्रे पोलीस उपअधीक्षक, अपर अधीक्षक, सरकारी वकील, सहायक संचालकांकडे पाठविली जातात.
त्यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता करावी लागते. यात पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो व त्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते.

Web Title: Darna police for grocery food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.