शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार - विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 18:21 IST

रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे.

रत्नागिरी - एखादा प्रकल्प आणला कोणी, याचे श्रेय लाटण्यासाठीचा वाद होणे, ही तशी नेहमीचीच गोष्ट. पण आता राजापूर तालुक्यातील नियोजित रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे. शिवसेनेचे कोकणातील दोन्ही खासदार या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे केल्यानंतर आज खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत हा प्रकल्प फडणवीस यांनीच आणल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तरहा प्रकल्प आपण आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुरावे दिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव करण्याचा इशाराही दिला आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे अशा १४ गावांमध्ये देशातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला परिसरातील एका गटाने पाठिंबा तर एका गटाने विरोध दर्शविला आहे. लोकांचा विरोध वाढल्यामुळे आता शिवसेनेनेही प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. सेनेच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना काल मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत प्रश्न केला गेला. या प्रकल्पासाठी रत्नागिरी तसेच रायगडचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते आग्रही होते, आता त्यांची भूमिका बदलली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेनेनेच हा प्रकल्प आणल्याचा संदेश सर्वत्र गेल्यामुळे त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडत हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनीच आणला असल्याचा पलटवार केला आहे. आपण कधी मागणी केली, कोणाकडे मागणी केली, पंतप्रधान किंवा पेट्रोलियम मंत्र्यांना कधी भेटलो, याचा पुरावा त्यांनी द्यावा, नाहीतर आपले चारित्र्यहनन केल्याचा हक्कभंग ठराव आपण संसदेत आणू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा