शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार - विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 18:21 IST

रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे.

रत्नागिरी - एखादा प्रकल्प आणला कोणी, याचे श्रेय लाटण्यासाठीचा वाद होणे, ही तशी नेहमीचीच गोष्ट. पण आता राजापूर तालुक्यातील नियोजित रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे. शिवसेनेचे कोकणातील दोन्ही खासदार या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे केल्यानंतर आज खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत हा प्रकल्प फडणवीस यांनीच आणल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तरहा प्रकल्प आपण आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुरावे दिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव करण्याचा इशाराही दिला आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे अशा १४ गावांमध्ये देशातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला परिसरातील एका गटाने पाठिंबा तर एका गटाने विरोध दर्शविला आहे. लोकांचा विरोध वाढल्यामुळे आता शिवसेनेनेही प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. सेनेच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना काल मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत प्रश्न केला गेला. या प्रकल्पासाठी रत्नागिरी तसेच रायगडचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते आग्रही होते, आता त्यांची भूमिका बदलली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेनेनेच हा प्रकल्प आणल्याचा संदेश सर्वत्र गेल्यामुळे त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडत हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनीच आणला असल्याचा पलटवार केला आहे. आपण कधी मागणी केली, कोणाकडे मागणी केली, पंतप्रधान किंवा पेट्रोलियम मंत्र्यांना कधी भेटलो, याचा पुरावा त्यांनी द्यावा, नाहीतर आपले चारित्र्यहनन केल्याचा हक्कभंग ठराव आपण संसदेत आणू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा