शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार - विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 18:21 IST

रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे.

रत्नागिरी - एखादा प्रकल्प आणला कोणी, याचे श्रेय लाटण्यासाठीचा वाद होणे, ही तशी नेहमीचीच गोष्ट. पण आता राजापूर तालुक्यातील नियोजित रिफायनरी प्रकल्प वादग्रस्त होऊ लागल्यामुळे तो कोणी आणला यावरुन भाजप-शिवसेनेत शाब्दिक ढकलाढकली सुरू झाली आहे. शिवसेनेचे कोकणातील दोन्ही खासदार या प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर येथे केल्यानंतर आज खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत हा प्रकल्प फडणवीस यांनीच आणल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तरहा प्रकल्प आपण आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुरावे दिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव करण्याचा इशाराही दिला आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे अशा १४ गावांमध्ये देशातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला परिसरातील एका गटाने पाठिंबा तर एका गटाने विरोध दर्शविला आहे. लोकांचा विरोध वाढल्यामुळे आता शिवसेनेनेही प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतली आहे. सेनेच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना काल मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत प्रश्न केला गेला. या प्रकल्पासाठी रत्नागिरी तसेच रायगडचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते आग्रही होते, आता त्यांची भूमिका बदलली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेनेनेच हा प्रकल्प आणल्याचा संदेश सर्वत्र गेल्यामुळे त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे विनायक राऊत यांनी आपली भूमिका मांडत हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनीच आणला असल्याचा पलटवार केला आहे. आपण कधी मागणी केली, कोणाकडे मागणी केली, पंतप्रधान किंवा पेट्रोलियम मंत्र्यांना कधी भेटलो, याचा पुरावा त्यांनी द्यावा, नाहीतर आपले चारित्र्यहनन केल्याचा हक्कभंग ठराव आपण संसदेत आणू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा