विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

By Admin | Updated: May 31, 2014 22:28 IST2014-05-31T19:12:26+5:302014-05-31T22:28:51+5:30

मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़

Dangerous terrorism of development: Prof. H. M. Dasarda | विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

विकासाचा दहशतवाद धोक्याचा : प्रा़ एच़ एम़ देसरडा

एच़ एम़ देसरडा : आंधळ्या विकासाला विरोध

पुणे : नवीन सरकार स्थापनेनंतर देशातील अभिजन- महाजन धनदांडग्या जाती वर्गाने विकास मूलतत्ववादाचा जो गजर सुरू केला आहे तो समतामूलक शाश्वत विकासासाठी मोठा धोका असून भारतीय संविधानाच्या मूलभूत उद्दिष्टांशी विसंगत आहे, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा़ एच़ एम़ देसरडा यांनी केले़
प्रा़ देसरडा म्हणाले, आजमितीला मुख्य प्रश्न आहे़ कुणाचा विकास कशाचा विकास? जमीन, पाणी, वने, कुरणे, जैवविविधता याचा खातमा व मानवी हक्काचा बळी देऊन होत असलेला विकास हा धोकादायक असून त्यांची सद्दी केव्हाच संपली आहे़ २१ व्या शतकात हवामान बदलाचे वास्तव लक्षात न घेता कोणत्याही प्रकल्पाचा विचार आत्मघातकी असल्याची बाब आता कुणी अमान्य करू शकत नाही़
सरकारने कितीही सदिच्छापर गोष्टी जाहीर केल्या तरी सामाजिक - आर्थिक व्यवस्था आणि राजकीय अर्थशास्त्राची सरंजामी, भांडवली, तथाकथित समाजवादी, बांडगुळी संरचना ढाचा व घाट बदलत नाही तोवर सबका विकास ही बाब पोकळ आणि फसवी आहे़ या सरकारवर अंबानी, अदानी यांचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते़ ते नसल्याचे दाखवून देण्यासाठी सरकारला सर्वप्रथम तेलकिंमतीचा निर्णय करावा लागेल़ रोजगारवृद्धीसाठी मनरेगा जास्त प्रभावीपणे राबवावी लागेल़ पारदर्शी कारभाराची सुरवात निवडणूक खर्चाचा सर्व तपशील जाहीर करून करावा लागेल़ महागाई कमी करणे, इंधनआयातीवरील अवलंबित्व कमी करणे, धान्यनिर्यात बंद करणे या गोष्टी सरकारने कराव्यात. आमचा विकासाला आंधळा विरोध नाही तर आंधळ्या विकासाला विरोध आहे, असे प्रा़ देसरडा यांनी सांगितले़

Web Title: Dangerous terrorism of development: Prof. H. M. Dasarda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.