शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यातील खड्डयामुळे दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:39 IST

पनवेल, दि. 8 - मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप नागरीक आपल्या प्राणांना मुकत आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा ...

पनवेल, दि. 8 - मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे निष्पाप नागरीक आपल्या प्राणांना मुकत आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळयाजवळ बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे भाग्यश्री शिंदे या तरुण मुलीचा मृत्यू झाला. 

भाग्यश्री तिच्या अवेंजर मोटारसायकलवरुन बांधनवाडी रस्त्यावरुन जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना तिची गाडी स्लीप झाली व ती खाली पडली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रेलरने तिला चिरडले. भाग्यश्रीचा रक्ताच्या थारोळयात पडलेला मृतदेह पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी तीव्र आंदोलन केले. जवळपास दोन तास या महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. 

रस्त्यावरील खड्डयामुळे मुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलिसाचा मृत्यूमुंबई पोलीस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी संतोष एकनाथ शिंदे यांचा रस्त्यातील खड्ड्यांमुळे गुरुवारी दुर्देवी मृत्यू झाला. ते 42 वर्षांचे होते. मागच्या आठवडयात गुरुवारी संतोष शिंदे यांच्या दुचाकीचा  वाशी गाव सिंग्नल ब्रिजजवळच्या रस्त्यावर अपघात झाला होता. ते मुंबईहून नेरुळला चालले असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. रस्त्यावरील खड्डे आणि तेथे असलेल्या अंधारामुळे शिंदे यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना लगेचच नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

टॅग्स :Accidentअपघात