शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

दांडी यात्रा आजपासून पुन्हा...!

By admin | Updated: November 3, 2016 03:44 IST

दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह करणारे, स्वदेशीचा नारा देणारे गांधीजी नव्या पिढीला पुन्हा कळावे

मुरलीधर भवार,

डोंबिवली- दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह करणारे, स्वदेशीचा नारा देणारे गांधीजी नव्या पिढीला पुन्हा कळावेत यासाठी, गांधी विचारांना उजाळा देण्यासाठी यासाठी दोन प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांने पुन्हा दांडी यात्रा काढण्याचे ठरविले आहे. ती साबरमतीतून गुरूवारी सकाळी सुरू होईल. चंगळवादी पिढीला चालण्याचे महत्त्व समजावून सांगणे हाही या यात्रेचा एक हेतू आहे. १९३० ला हा सत्याग्रह झाला. स्वदेशीचे पुरस्कर्ते, अहिंसेचा संदेश देणारे असूनही गांधीजी पाकधार्जिणे असल्याचा प्रचार आजही केला जातो. त्याविरोधात के. शिवा अय्यर हे ध्येयवेडे गांधीवादी प्राध्यापक, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यासोबत दांडी यात्रा करणार आहेत. ही यात्रा साबरमतीहून निघेल. ती ३ नोव्हेंबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत चालेल. अय्यर (वय ५४) हे डोंबिवलीच्या सागावला राहतात. मॉडेल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परिसरातील बेकायदा बांधकामांची प्रकरणे उघडकीस आण, सोसायटीला रस्ता मिळवून देण्याचे काम करत आहेत. उपोषण आणि पदयात्रा ही दोन हत्यारे त्यांनी उपसली. गांधीजींच्या सत्याग्रहावर त्यांचा विश्वास आहे. गतवर्षी त्यांनी साबरमती ते दांडी अशी यात्रा केली होती. आताही ते दररोज ३५ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. हे अंतर ३९० किलोमीटरचे असले तरी पहिल्या दांडी यात्रेचा अनुभव गाठीशी असल्याने ही यात्रा कमी वेळेत पार पडेल, असा विश्वास त्यांना आहे. टाटा कन्सलटन्सीमध्ये कामाला असलेला त्यांचा विद्यार्थी रवी पांडे हाही यात्रेत सहभागी होणार आहे. शिवाय ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले ओमप्रकाश सुखलानी हेही सहभागी होतील. सुखलानी यांचे कुटुंबीय फाळणीवेळी भारतात आले. त्यांच्यासाठी गांधीजी परमेश्वर आहेत. गांधीजींसोबत दांडी यात्रेत सहभागी झालेल्या इला भट (वय ८९) यांना नमस्कार करून ही यात्रा सुरू होईल.>गांधी आचरणाची गरजगांधीजीनी स्वदेशीची चळवळ सुरु केली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रह केला नसता, तर आज मीठही महाग मिळाले असते. गांधीनी हरीजनांसाठी काम केले. देशवासीयांना अंगभर वस्त्र मिळत नाही म्हणून त्यांनी केवळ पंचा नेसणे पसंत केले. स्वदेशी गांधीची प्रतिमा आजही मलीन केली जाते. ते पाकधार्जिणे होते, असा अपप्रचार केला जातो. देशाला आजही गांधीच्या विचारांची आणि आचरणाची गरज आहे. तोच संदेश या यात्रेतून दिला जाईल, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले. सुखवस्तू झाल्याने, प्रवासाची साधने वाढल्याने चालणे होत नाही. त्यामुळे या यात्रेतून चालण्याचा संदेश दिला जाणार आहे. रामदेवबाबा जरी स्वदेशीचा नारा देत असले, तरी खरे स्वदेशी होते, ते गांधीजी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.