शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

दांडी यात्रा आजपासून पुन्हा...!

By admin | Updated: November 3, 2016 03:44 IST

दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह करणारे, स्वदेशीचा नारा देणारे गांधीजी नव्या पिढीला पुन्हा कळावे

मुरलीधर भवार,

डोंबिवली- दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह करणारे, स्वदेशीचा नारा देणारे गांधीजी नव्या पिढीला पुन्हा कळावेत यासाठी, गांधी विचारांना उजाळा देण्यासाठी यासाठी दोन प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांने पुन्हा दांडी यात्रा काढण्याचे ठरविले आहे. ती साबरमतीतून गुरूवारी सकाळी सुरू होईल. चंगळवादी पिढीला चालण्याचे महत्त्व समजावून सांगणे हाही या यात्रेचा एक हेतू आहे. १९३० ला हा सत्याग्रह झाला. स्वदेशीचे पुरस्कर्ते, अहिंसेचा संदेश देणारे असूनही गांधीजी पाकधार्जिणे असल्याचा प्रचार आजही केला जातो. त्याविरोधात के. शिवा अय्यर हे ध्येयवेडे गांधीवादी प्राध्यापक, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यासोबत दांडी यात्रा करणार आहेत. ही यात्रा साबरमतीहून निघेल. ती ३ नोव्हेंबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत चालेल. अय्यर (वय ५४) हे डोंबिवलीच्या सागावला राहतात. मॉडेल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परिसरातील बेकायदा बांधकामांची प्रकरणे उघडकीस आण, सोसायटीला रस्ता मिळवून देण्याचे काम करत आहेत. उपोषण आणि पदयात्रा ही दोन हत्यारे त्यांनी उपसली. गांधीजींच्या सत्याग्रहावर त्यांचा विश्वास आहे. गतवर्षी त्यांनी साबरमती ते दांडी अशी यात्रा केली होती. आताही ते दररोज ३५ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. हे अंतर ३९० किलोमीटरचे असले तरी पहिल्या दांडी यात्रेचा अनुभव गाठीशी असल्याने ही यात्रा कमी वेळेत पार पडेल, असा विश्वास त्यांना आहे. टाटा कन्सलटन्सीमध्ये कामाला असलेला त्यांचा विद्यार्थी रवी पांडे हाही यात्रेत सहभागी होणार आहे. शिवाय ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले ओमप्रकाश सुखलानी हेही सहभागी होतील. सुखलानी यांचे कुटुंबीय फाळणीवेळी भारतात आले. त्यांच्यासाठी गांधीजी परमेश्वर आहेत. गांधीजींसोबत दांडी यात्रेत सहभागी झालेल्या इला भट (वय ८९) यांना नमस्कार करून ही यात्रा सुरू होईल.>गांधी आचरणाची गरजगांधीजीनी स्वदेशीची चळवळ सुरु केली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रह केला नसता, तर आज मीठही महाग मिळाले असते. गांधीनी हरीजनांसाठी काम केले. देशवासीयांना अंगभर वस्त्र मिळत नाही म्हणून त्यांनी केवळ पंचा नेसणे पसंत केले. स्वदेशी गांधीची प्रतिमा आजही मलीन केली जाते. ते पाकधार्जिणे होते, असा अपप्रचार केला जातो. देशाला आजही गांधीच्या विचारांची आणि आचरणाची गरज आहे. तोच संदेश या यात्रेतून दिला जाईल, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले. सुखवस्तू झाल्याने, प्रवासाची साधने वाढल्याने चालणे होत नाही. त्यामुळे या यात्रेतून चालण्याचा संदेश दिला जाणार आहे. रामदेवबाबा जरी स्वदेशीचा नारा देत असले, तरी खरे स्वदेशी होते, ते गांधीजी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.