शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोट्यवधींचा डांबर घोेटाळा, अनेक अधिकारी, कंत्राटदार अडकण्याची शक्यता  

By यदू जोशी | Updated: July 10, 2018 06:15 IST

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते बांधकामात पुरेसे डांबर न वापरता ते वापरल्याचे दाखवून कोेट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते बांधकामात पुरेसे डांबर न वापरता ते वापरल्याचे दाखवून कोेट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही प्रकरणांत चौकशी झाली, मात्र राज्यव्यापी चौकशी झाली तर किमान ५० मोठे कंत्राटदार आणि १०० लहान-मोठे अधिकारी अडकू शकतात.आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या या घोटाळ्याने युती सरकारच्या काळातही पाय पसरले असल्याचे बोलले जाते. नेमके काय ते चौकशी झाली तर समोर येईल. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने आघाडी सरकारच्या काळातील डांबर घोटाळ्यांवर बोट ठेवून चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्यातील निवडक प्रकरणांत चौकशी केली असता, डांबर खरेदी करून ते रस्ते बांधकामात वापरल्याची एकसारखी १२ बिजके (इनव्हॉईस कॉपी) ही वेगवेगळ्या कामांच्या बिलांमध्ये जोडण्यात आली.१६५ प्रकरणांमध्ये बनावट इनव्हॉइस कॉपी जोडण्यात आल्या. डांबराचे इनव्हॉईस न जोडताच २६ बिले अदा केली. शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक उपक्रमातील तीन आॅईल कंपन्यांकडूनच डांबर खरेदी करावे लागते. मात्र, तब्बल १६५ प्रकरणांमध्ये बनावट इनव्हॉईस वापरण्यात आले. एक इनव्हॉईस हे सरासरी १० लाख रुपयांचे होते. खासगी पुरवठादाराकडून कंत्राटदारांनी डांबर खरेदी करू नये, ते सार्वजनिक उपक्रमातील तीन कंपन्यांकडूनच घेतले पाहिजे, हा शासनाचा नियम धाब्यावर बसविण्यात आला.किमान १० वर्षांतील अशा डांबर घोटाळ्याची चौकशी होण्याची आवश्यकता असताना, ती टाळण्याचा प्रयत्न बांधकाम खात्यातील धुरिणांकडून सध्या केला जात आहे. बड्या कंत्राटदारांची चौकशी केली आणि ते अडकले तर रस्त्यांची नवीन कामे करण्यासाठी कंत्राटदारच शिल्लक राहणार नाहीत व त्याचा फटका कामांना बसेल, असे तकलादू समर्थनही केले जात आहे.१५ वर्षांत सुमारे ४०० कोटींचे घोटाळेइतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील रस्ते लवकर खराब का होतात, याचे उत्तर डांबर घोटाळ्यात दडलेले आहे. गेल्या १५ वर्षांत सुमारे ४०० कोटींचे डांबर घोटाळे झाल्याचा संशय असून, त्या माध्यमातून चार हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यांची कंत्राटदार अन् अधिकाऱ्यांनी वाट लावली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्र