दावणीला चारा, मागेल त्याला शेततळे

By Admin | Updated: September 3, 2015 01:35 IST2015-09-03T01:35:39+5:302015-09-03T01:35:39+5:30

जनावरांच्या छावणीसोबतच दावणीला चारा देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्याची अमंलबजावणी केली जाईल. तसेच मराठवाड्यात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असल्याचे आश्वासन

Dada's fodder, he will ask for the farmland | दावणीला चारा, मागेल त्याला शेततळे

दावणीला चारा, मागेल त्याला शेततळे

प्रताप नलावडे, बीड
जनावरांच्या छावणीसोबतच दावणीला चारा देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्याची अमंलबजावणी केली जाईल. तसेच मराठवाड्यात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौताडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुष्काळ भागाची पाहणी सौताडा येथून सुरू केली. निसर्ग कोपला असला तरी बळीराजाने संयम बाळगावा. शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहिल, असे आश्वस्तही त्यांनी केले. पालकमंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी आदी त्यांच्यासोबत होते.
सौताडा गावातील महिलांनी दिवसाला केवळ दोन टँकर येत असल्याने पिण्याला सुद्धा पाणी उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री तुमच्या शिवारात आले आहेत. तुमचे प्रश्न सोडवतील, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
प्रत्येकाला पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि प्रत्येक हाताला काम यासाठी योजना तयार करत असून लवकरच त्याचा जनतेला फायदा होईल. राज्यात तीन वर्षांत दीड लाख शेततळी तयार करण्यात येणार असून त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा पावसात संवाद
मुख्यमंत्री नायगाव परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना अचानक पावसाची सर मोठी सर आली. पावसात भिजतच फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद सुरूच ठेवला. त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने त्यांच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी समोर सगळे भिजत आहेत. ते दिसत नाही का, अशा शब्दांत अधिकाऱ्याला खडसावले.

Web Title: Dada's fodder, he will ask for the farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.