शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

"दादा आप आए बहार आयी है", हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, अजित पवारांना उद्देशून म्हणाले… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:04 IST

मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : मौजे सांगाव (ता. कागल) येथे सोमवारी  २२ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण, मल्लिकार्जुन सेवा संस्थेचा अमृतमहोत्सव सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाळ्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री आणि हसन मुश्रीफ यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी होण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांना मधल्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे आपण पालकमंत्री झालो. तसेच मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला, नागरिकांनी सातत्याने पाठिंबा दिला, त्यामुळे आपण संकटातून सुखरूप बाहेर पडलो, अशा भावना व्यक्त करत असताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. 

याचबरोबर, "दादा आप आए बहार आयी है" असं म्हणत प्रोत्साहन पर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेने मला समजून घेतले, असे हसन मुश्रीफ म्हणाले. 

अजितदादांनी आजपर्यंत अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी दिली. पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं. तीसुद्धा संधी दादांनी दिली. मला आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही - अजित पवारकोल्हापूर हे राष्ट्रवादी पक्षाचेवैचारिक केंद्र म्हणून ओळखले जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येते आणि जाते. कोणीही कायम सत्तेत राहण्याचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे व्हिजन असणारे नेते आहेत. तशा योजना चांदा ते बांधापर्यंत हव्यात. सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. यासाठी भाजप-शिवसेना सरकारमध्ये आम्ही सामील झालो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

याचबरोबर, विरोधी पक्षात असताना सरकारवर विकास कामांबाबत वजन पडत नाही, कामे होत नाहीत. जे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला नको आहेत ते प्रकल्प होणार नाहीत. वचनपूर्तीचे राजकारण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. मुश्रीफ यांनी आता जास्त वेळ कागलमध्ये न थांबता, त्यांनी व आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात फिरावे, असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर