शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डी. एस. कुलकर्णींना तात्पुरता दिलासा, अटक न करण्याचे निर्देश : दोन महिन्यांत १५० कोटी देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:57 IST

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नीला उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा देत २३ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नीला उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा देत २३ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. ठेवीदारांचे पैसे कसे व कधी परत करणार, अशी विचारणा कुलकर्णी यांच्याकडे गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर दोन महिन्यांत १५० कोटी रुपये देण्याचे त्यांनी मान्य केलेआहे.२,७७४ ठेवीदारांचे २०० कोटींहून अधिक रुपये कुलकर्णी यांना परत करायचे आहेत. या ठेवीदारांची देणी थकविण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे सत्र न्यायालयाने डीएसके व त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, डीएसके दाम्पत्याने उच्च न्यायालयातधाव घेतली.१० नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना एका आठवड्याचा दिलासा दिला. त्याची मुदत शुक्रवारी संपत होती. न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत त्यांना अटक न करण्याचा आदेश दिल्यामुळे डीएसके दाम्पत्याची अटक तूर्तास टळली आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणी तात्पुरता का होईना, पण दिलासा मिळाला आहे.दोन महिन्यांत १५० कोटी रुपये देण्याचे न्यायालयाला कुलकर्णी यांनी सांगितले आहे. परंतु लोक पैसे परत करण्याचे आश्वासन देतात. मात्र, त्या नंतर टाळाटाळ करतात, असा अनुभव आहे, असे न्या. अजय गडकरी यांनी या वेळी म्हटले.ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत अन्य पर्यायांचा विचार करा. तुम्ही इतक्या वर्षांत कमावलेल्या प्रतिष्ठेबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नाही, असेही न्यायालयाने बजावले.पैसे परत करण्याबाबत भूमिका स्पष्ट करादोन महिने हा मोठा कालावधी असल्याचे न्या. अजय गडकरी यांनी म्हटले, तसेच याचिकाकर्त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा अर्जावर सुनावणी घेण्यास सुरुवात करू, असेही बजावले आहे. डीएसकेंवर अनेक बँकांचे मिळून १,४०० कोटी रुपये कर्ज आहे.हे कर्ज त्यांनी मालमत्ता गहाण ठेवून घेतले होते. मात्र, आता याच मालमत्ता जप्त करून, संबंधित बँका कर्जाचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. बालेवाडी आणि फुरसुंगीमधील जमीन सेंट्रल बँक आॅफ इंडियाने जप्त केली आहे. त्यापैकी फुरसुंगीमधील जमीन ही डीएसकेंच्या बहुचर्चित ड्रीम सिटीचा भाग आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCrimeगुन्हाPuneपुणे