शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:14 IST

महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता

ठळक मुद्देपश्चिम किनारपट्टीवर रेड अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबईत अतिवृष्टीची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते बुधवारी दुपारनंतर पश्चिम किनारपट्टीवर हरिहरेश्वर आणि दमण दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्हा; तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात ३ जून रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी (२२० मिमीहून अधिक) होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची इशारा देण्यात आला आहे.निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी अडीच वाजता पणजीपासून २९० किमी, मुंबईपासून ३८० किमी आणि सुरतपासून ६०० किमी अंतरावर होते. ते गेल्या ६ तासांमध्ये ताशी १३ किमी वेगाने किनार्‍याच्या दिशने पुढे सरकत आहे. मंगळवारी रात्री त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते पश्चिम किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वार्‍याचा वेग १०० ते ११० किमी इतका असण्याची शक्यता आहे. किनार्‍यावर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुरुवारी दुपारपर्यंत राहण्याचीशक्यता आहे.कोकण, गोव्यात येत्या २४ तासांत सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दक्षिण गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, दमण, दादरा आणि नगर हवेली व सुरत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा परिणाम जमिनीवर अगदी धुळे, नंदुरबार, पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत जाणविणार आहे. महाराष्ट्र, गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळी या वार्‍यांचा वेग ११० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रात भरतीच्या वेळी १ ते २ मीटर इंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानेव्यक्त केला आहे. राज्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कराड ४४, आजरा ४२, कोल्हापूर ३२, उस्मानाबाद २०, दाभोलीम १४, पणजी १३.६, औरंगाबाद १०, रत्नागिरी ८.३, जळगाव, सोलापूर ३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.

इशारा३ जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेGujaratगुजरातRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ