शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

महिनाभरात पीक विम्याची नुकसानभरपाई मिळणार; राज्यात ३४ लाख बाधित शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:11 IST

२० लाख जणांचे पंचनामे पूर्ण

पुणे : अतिवृष्टीने बाधित पिकांची विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने ९७३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारही लवकरच ९०० कोटी रुपये विमा कंपन्यांकडे जमा करणार असून, त्यामुळे कंपन्यांना आता पैसे अदा करावेच लागतील. राज्य सरकारने पैसे जमा केल्यानंतर नियमाप्रमाणे विमा कंपन्यांनी केंद्राकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करायला हवी होती. ती केलीच गेली नाही. राज्य कृषी खात्याच्या पाठपुराव्यानंतर आता विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी केली आहे.राज्यात एकूण सहा विमा कंपन्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. जुलै व नंतरच्या अतिवृष्टीत पिके बाधित झाल्याच्या राज्यभरात एकूण ३३ लाख ८३ हजार पूर्वसूचना विमा कंपन्यांकडे दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने कंपन्यांकडे विम्याच्या पहिल्या हप्त्याचे ९७३ कोटी रुपये जमा करून १५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला. दरम्यानच्या काळात विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करणे आवश्यक होते. राज्याच्या ९७३ कोटी रुपयांवर व्याज मिळत असल्याने कंपन्यांकडून ही मागणी केली जात नव्हती. मात्र, कृषी खात्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता सर्व कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे.त्यामुळे साधारण महिनाभरात त्यातही काहीजणांना दिवाळीपूर्वीच विम्याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. दाखल झालेल्या ३३ लाख पूर्वसूचनांपैकी २० लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे कृषी खात्याकडून युद्धस्तरावर करण्यात येत आहेत.   केंद्र सरकारकडे सर्व कंपन्यांनी बिले (एकूण मागणी) जमा केली असून, रकमेची मागणी केली आहे. ते पैसे विनाविलंब मिळतात. पंचनामे होऊन ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेली आहे, त्यांना पैसे मिळण्यात आता काही अडचण नाही.- विनयकुमार आवटी, विभाग प्रमुख, सांख्यिकी, कृषी विभाग