शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

महिनाभरात पीक विम्याची नुकसानभरपाई मिळणार; राज्यात ३४ लाख बाधित शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:11 IST

२० लाख जणांचे पंचनामे पूर्ण

पुणे : अतिवृष्टीने बाधित पिकांची विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने ९७३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारही लवकरच ९०० कोटी रुपये विमा कंपन्यांकडे जमा करणार असून, त्यामुळे कंपन्यांना आता पैसे अदा करावेच लागतील. राज्य सरकारने पैसे जमा केल्यानंतर नियमाप्रमाणे विमा कंपन्यांनी केंद्राकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करायला हवी होती. ती केलीच गेली नाही. राज्य कृषी खात्याच्या पाठपुराव्यानंतर आता विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी केली आहे.राज्यात एकूण सहा विमा कंपन्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. जुलै व नंतरच्या अतिवृष्टीत पिके बाधित झाल्याच्या राज्यभरात एकूण ३३ लाख ८३ हजार पूर्वसूचना विमा कंपन्यांकडे दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने कंपन्यांकडे विम्याच्या पहिल्या हप्त्याचे ९७३ कोटी रुपये जमा करून १५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला. दरम्यानच्या काळात विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करणे आवश्यक होते. राज्याच्या ९७३ कोटी रुपयांवर व्याज मिळत असल्याने कंपन्यांकडून ही मागणी केली जात नव्हती. मात्र, कृषी खात्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता सर्व कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे.त्यामुळे साधारण महिनाभरात त्यातही काहीजणांना दिवाळीपूर्वीच विम्याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. दाखल झालेल्या ३३ लाख पूर्वसूचनांपैकी २० लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे कृषी खात्याकडून युद्धस्तरावर करण्यात येत आहेत.   केंद्र सरकारकडे सर्व कंपन्यांनी बिले (एकूण मागणी) जमा केली असून, रकमेची मागणी केली आहे. ते पैसे विनाविलंब मिळतात. पंचनामे होऊन ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेली आहे, त्यांना पैसे मिळण्यात आता काही अडचण नाही.- विनयकुमार आवटी, विभाग प्रमुख, सांख्यिकी, कृषी विभाग