शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे गृहित धरून पीकविम्याची रक्कम देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:01 IST

कंपन्यांकडून होणाऱ्या लुटीवरून संताप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी व महसूल खात्याने पीक नुकसानीचे केलेल्या पंचनाम्यातील आकडेवारी प्रमाण मानून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल. तशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. शिवसेनेचे कैलाश घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले आणि भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्याबाबत झालेल्या अन्यायाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यावरून राज्यभरातील पीकविम्याचा प्रश्न ऐरणीवर आला. विमा कंपन्या मालामाल होत असून, शेतकऱ्यांना विम्याचा कुठलाही फायदा दिला जात नाही, अशी भावना सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विमा कंपनीमार्फत बीड जिल्ह्यातील पीकविमा योजना चालविली जात असून, ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ती राज्यभरात लागू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारची स्वत:ची विमा कंपनी सुरू करण्याचा विचार आहे, तसेच एक सर्वंकष पीकविमा धोरण लवकरच आणले जाईल. विमा कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा आणावी आणि त्यावरील मिळालेला नफा त्यांनी शासनाकडे वळता करावा व तोटा आल्यास तो सरकारने सहन करावा, ही बाब विचाराधीन आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाना पटोले, गिरीश महाजन, मेघना बोर्डीकर, समीर कुणावार, संभाजी पाटील निलंगेकर, प्रकाश सोळंके यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 

५१७कोटीनफा एका जिल्ह्यात कंपनीने कमावलाn विमा कंपन्याच्या घशात किती मोठा नफा जात आहे, याची आकडेवारी भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली. n उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्यातून विमा कंपनीला ६०४ कोटी रुपये मिळाले व त्यातील फक्त ८७ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपोटी देण्यात आले. कंपनीला ५१७ कोटी रुपयांचा नफा झाला, असा दावा पाटील यांनी केला.

विरोधकांचा सभात्यागपीकविम्याबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून, सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सभात्याग केला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाvidhan sabhaविधानसभा