शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

पंचनामे गृहित धरून पीकविम्याची रक्कम देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:01 IST

कंपन्यांकडून होणाऱ्या लुटीवरून संताप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी व महसूल खात्याने पीक नुकसानीचे केलेल्या पंचनाम्यातील आकडेवारी प्रमाण मानून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल. तशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. शिवसेनेचे कैलाश घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले आणि भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्याबाबत झालेल्या अन्यायाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यावरून राज्यभरातील पीकविम्याचा प्रश्न ऐरणीवर आला. विमा कंपन्या मालामाल होत असून, शेतकऱ्यांना विम्याचा कुठलाही फायदा दिला जात नाही, अशी भावना सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विमा कंपनीमार्फत बीड जिल्ह्यातील पीकविमा योजना चालविली जात असून, ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ती राज्यभरात लागू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारची स्वत:ची विमा कंपनी सुरू करण्याचा विचार आहे, तसेच एक सर्वंकष पीकविमा धोरण लवकरच आणले जाईल. विमा कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा आणावी आणि त्यावरील मिळालेला नफा त्यांनी शासनाकडे वळता करावा व तोटा आल्यास तो सरकारने सहन करावा, ही बाब विचाराधीन आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाना पटोले, गिरीश महाजन, मेघना बोर्डीकर, समीर कुणावार, संभाजी पाटील निलंगेकर, प्रकाश सोळंके यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 

५१७कोटीनफा एका जिल्ह्यात कंपनीने कमावलाn विमा कंपन्याच्या घशात किती मोठा नफा जात आहे, याची आकडेवारी भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली. n उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्यातून विमा कंपनीला ६०४ कोटी रुपये मिळाले व त्यातील फक्त ८७ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपोटी देण्यात आले. कंपनीला ५१७ कोटी रुपयांचा नफा झाला, असा दावा पाटील यांनी केला.

विरोधकांचा सभात्यागपीकविम्याबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून, सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सभात्याग केला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाvidhan sabhaविधानसभा