शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पंचनामे गृहित धरून पीकविम्याची रक्कम देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:01 IST

कंपन्यांकडून होणाऱ्या लुटीवरून संताप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी व महसूल खात्याने पीक नुकसानीचे केलेल्या पंचनाम्यातील आकडेवारी प्रमाण मानून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाईल. तशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. शिवसेनेचे कैलाश घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले आणि भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्याबाबत झालेल्या अन्यायाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यावरून राज्यभरातील पीकविम्याचा प्रश्न ऐरणीवर आला. विमा कंपन्या मालामाल होत असून, शेतकऱ्यांना विम्याचा कुठलाही फायदा दिला जात नाही, अशी भावना सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विमा कंपनीमार्फत बीड जिल्ह्यातील पीकविमा योजना चालविली जात असून, ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ती राज्यभरात लागू करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारची स्वत:ची विमा कंपनी सुरू करण्याचा विचार आहे, तसेच एक सर्वंकष पीकविमा धोरण लवकरच आणले जाईल. विमा कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा आणावी आणि त्यावरील मिळालेला नफा त्यांनी शासनाकडे वळता करावा व तोटा आल्यास तो सरकारने सहन करावा, ही बाब विचाराधीन आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाना पटोले, गिरीश महाजन, मेघना बोर्डीकर, समीर कुणावार, संभाजी पाटील निलंगेकर, प्रकाश सोळंके यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 

५१७कोटीनफा एका जिल्ह्यात कंपनीने कमावलाn विमा कंपन्याच्या घशात किती मोठा नफा जात आहे, याची आकडेवारी भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली. n उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्यातून विमा कंपनीला ६०४ कोटी रुपये मिळाले व त्यातील फक्त ८७ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेपोटी देण्यात आले. कंपनीला ५१७ कोटी रुपयांचा नफा झाला, असा दावा पाटील यांनी केला.

विरोधकांचा सभात्यागपीकविम्याबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून, सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सभात्याग केला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाvidhan sabhaविधानसभा