शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

शेतकऱ्यांवरील संकटांचा अवकाळ संपेना; युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला ब्रेक; मोठा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:40 IST

आधी पावसाने रडवले; पिके पाहिजे तशी आलीच नाहीत... जी आली त्यांनाही बाजारात चांगला भाव मिळेना

रावसाहेब उगले, नाशिकMarathi News ): इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची झळ थेट नाशिकच्या निर्यातक्षम द्राक्ष वाहतुकीला बसली आहे. मागील आठवड्यात हमासने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात एक जहाज उडविले. त्यामुळे जागतिक जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक थांबविली आहे.  मालवाहतूक आणि विमा खर्चात ३० टक्के वाढ, तसेच युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा विलंब लागणार असल्याने  त्याचा परिणाम भारतातून युरोपियन देशांमध्ये होणाऱ्या द्राक्षनिर्यातीवर झाला आहे. परिणामी, नाशिकसह  राज्यातील निर्यातदारांनी द्राक्ष खरेदी बंद केली आहे.

काय म्हणतात उत्पादक शेतकरी ?

जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाशिकमधून खऱ्या अर्थाने द्राक्षे निर्यात केली जातात; परंतु निर्यातदारांनाही अतिरिक्त अडीच ते तीन हजार डॉलरची भाडेवाढ सहन करावी लागेल, असे शिरसगावच्या मॅग्नस फार्म फ्रग्चे संचालक  लक्ष्मण सावळकर यांनी सांगितले. नाशिकच्या कोऱ्हो येथील सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे म्हणाले की, युद्धामुळे जहाज वाहतूक कंपन्यांनी वाहतूक थांबविली आहे. जे कंटेनर या मार्गावर आहेत त्यांना पुढे पाठवायचे की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. पर्यायी मार्गाने कंटेनर पाठवायचे ठरल्यास वेळ आणि पैसा लागणार आहे. 

पांढरं सोनं : पावसात सापडलं अन् भावात घसरलं

विवेक चांदूरकर, खामगाव (जि. बुलढाणा) : अवकाळीच्या तडाख्यातून एकेक झाडं वाचवलं. लागवडपासून ते वेचणीपर्यंत निंदण, फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र हाती येणारं पीक पावसात सापडलं अन् पांढरं सोनं भावात घसरलं. यंदा १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भावाची अपेक्षा होती. मात्र, ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकावा लागत आहे, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.       

दर्जा घसरल्याचे कारण...

अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचा दर्जा घसरला आहे. कापसाची बोंडे खुलली नसून कवळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. गत पाच वर्षांतील कापसाचा हा नीचांकी दर आहे. सन २०२१-२२ मध्ये कापसाचे दर १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले हाेते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली होती. 

५०० रुपयांचा चढ-उतार, हळद उत्पादक झाले हैराण

रमेश वाबळे | हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या दरात दिवसाआड चारशे ते पाचशेंचा चढ-उतार होत आहे. त्यामुळे हळद विक्रीसाठी आणावी की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये द्विधावस्था आहे. तर व्यापारीदेखील खरेदी करताना हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.

आवक वाढली अन् भाव घसरले...

मार्केट यार्डात बुधवारी ६०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. या दिवशी सरासरी १२ हजार ५० रुपये भाव मिळाला. जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांनी भाव वधारल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार २ हजार ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. परंतु आवक वाढताच भावात सरासरी ४५० रुपयांची घसरण झाली.

सोयाबीनमुळेही  पदरी निराशा 

मोंढ्यात २१ डिसेंबर रोजी सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० रुपये भाव मिळाला होता. तर दुसऱ्या दिवशी भाव घसरून ४ हजार ५७५ रुपयांवर आले. यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकbuldhanaबुलडाणाHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी