शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 21, 2014 22:39 IST

तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे.

पेण : तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. एकंदरच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मृगाचा पाऊस बेताचाच झाल्याने कृषीक्षेत्रला जबरदस्त फटका बसल्यातच जमा आहे. प्रारंभीचा पाऊसच न पडल्याने जे पेरलंय ते उगवलंय खरं पण पाणी मागते झाल्याने उगवलेल्या रोपांनी आता राम म्हणण्यास सुरुवात केली आहे. धूळपेरणीच्या वाफ्यांना तग धरायला पाऊस नसल्याने शेतक:यांवर दुबार पेरणीचे संकट आवासून उभे ठाकलंय.
यंदाच्या खरीप हंगामात जेमतेम 93 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय. कृषी क्षेत्रसाठी हा धोक्याचा इशारा आहे. कमी पावसापेक्षाही मान्सूनचे आगमन व स्थिरावण्यास होणारा उशिर, पावसाचे असमान वितरण आणि त्यातील पडणारे खंड ही शेतीक्षेत्रसाठी चिंतेची बाब आहे. शेतामध्ये पिक उत्पादनाच्या दृष्टीने पेरणीच्या हंगामाची सुरुवातीची वेळ साधण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत असतो. रायगडातील प्रारंभीची धूळपेरणी पूर्ण होवून काही काही मृगधारा बरसल्या ख:या परंतु त्यामध्ये स्थिरता नसल्याने मृगाचा पाऊस जेमतेम पडला. त्यानंतर तापमानवाढीचा जबर फटका उगवलेल्या रोपांना बसत आहे. गेले आठ दहा दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपे सूर्याच्या कडक उन्हात तग धरू शकणार नाहीत. मृग नक्षत्र संपून आद्र्रा नक्षत्रची पहाट उजाडणार आहे. पण जाणारे नक्षत्र येणा:या नक्षत्रला साथ देत नसल्याने आभाळ निरभ्र आहे. हवेत गारवा नाही. दिवसभर कडक उन्हे पडतात. अशा कठीण परिस्थितीत खरीपाचा हंगाम मान्सूनने दडी मारल्याने संकटाच्या सीमारेषेवर उभा आहे.
शेतीचे यंदा खरीप हंगामाचे आपत्कालीन नियोजन शेतक:यांना समजावून सांगण्यात व त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा फारसा प्रय} अद्याप कृषी विभागाकडून झालेला नाही. पावसाची समस्या अधिक उग्र झाल्यास शेतक:यांच्या खरीप हंगाम वाचविण्यासाठी पिक बदल करण्याची परिस्थितीही रायगडात नाही. निव्वळ भाताचे उत्पादन होणारी शेती असल्याने कमी दिवसात उत्पादन घेणारी बियाणो यासाठी कृषी विभागाची जनजागरण मोहिम हाती घेणो पुढील काही दिवसात  अपरिहार्य आहे. राज्य व केंद्रीय पातळीवरून मान्सूनच्या या अपत्तीदर्शक संभाव्य परिस्थितीचे अवलोकन करणो गरजेचे ठरणार आहे. कारण शेती, उद्योग, ग्राहक या तीन घटकांचे भवितव्य मान्सूनवर अवलंबून आहे. 
मान्सून या घटकाचा जीवनदाता आहे. मान्सूनचा फटका जिथे जिथे बसतो तिथे याला जबर फटका बसतो. रायगडाची शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने जो पेरा उगवला आहे तो मान्सून अभावी टिक णार नाही. संकटाचे काळे ढग शेतक:यांच्या हृदयावर गहिरे आघात करीत आहेत. प्रारंभीचा पेरा पावसाअभावी करपून गेला आणि जाणार या भीतीमुळे शेतकरी अर्धमेला झालाय. 
दुबार पेरणीसाठी नव्याने बियाणो खरेदी करायची, त्यासाठी लागणारा पैसा व पावसाचे लहरी चित्र अशा विचित्र परिस्थितीमुळे शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या अस्मानी संकटामुळे कासावीस झाला आहे. पावसाचे आगमन लवकर व्हावे अशीच प्रार्थना  शेतकरी करीत आहेत.  (वार्ताहर)
 
4रायगडातील प्रारंभीची धूळपेरणी पूर्ण होऊन काही  मृगधारा बरसल्या ख:या परंतु त्यामध्ये स्थिरता नसल्याने मृगाचा पाऊस जेमतेम पडला. त्यानंतर तापमानवाढीचा जबर फटका उगवलेल्या रोपांना बसत आहे. गेले आठ दहा दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपे सूर्याच्या कडक उन्हात तग धरू शकणार नाहीत.
 
4रायगडाची शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने जो पेरा उगवला आहे तो मान्सूनअभावी टिकणार नाही. प्रारंभीचा पेरा पावसाअभावी करपून गेला आणि जाणार या भीतीमुळे शेतकरी अर्धमेला झालाय. दुबार पेरणीसाठी नव्याने बियाणी खरेदी करायची तर त्यासाठी लागणारा पैसा आणि पावसाचे लहरी चित्र यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे.