शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 21, 2014 22:39 IST

तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे.

पेण : तापमान वाढीचा जबरदस्त फटका कृषी क्षेत्रला बसत असून याचा मोठा घातक परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. एकंदरच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मृगाचा पाऊस बेताचाच झाल्याने कृषीक्षेत्रला जबरदस्त फटका बसल्यातच जमा आहे. प्रारंभीचा पाऊसच न पडल्याने जे पेरलंय ते उगवलंय खरं पण पाणी मागते झाल्याने उगवलेल्या रोपांनी आता राम म्हणण्यास सुरुवात केली आहे. धूळपेरणीच्या वाफ्यांना तग धरायला पाऊस नसल्याने शेतक:यांवर दुबार पेरणीचे संकट आवासून उभे ठाकलंय.
यंदाच्या खरीप हंगामात जेमतेम 93 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय. कृषी क्षेत्रसाठी हा धोक्याचा इशारा आहे. कमी पावसापेक्षाही मान्सूनचे आगमन व स्थिरावण्यास होणारा उशिर, पावसाचे असमान वितरण आणि त्यातील पडणारे खंड ही शेतीक्षेत्रसाठी चिंतेची बाब आहे. शेतामध्ये पिक उत्पादनाच्या दृष्टीने पेरणीच्या हंगामाची सुरुवातीची वेळ साधण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत असतो. रायगडातील प्रारंभीची धूळपेरणी पूर्ण होवून काही काही मृगधारा बरसल्या ख:या परंतु त्यामध्ये स्थिरता नसल्याने मृगाचा पाऊस जेमतेम पडला. त्यानंतर तापमानवाढीचा जबर फटका उगवलेल्या रोपांना बसत आहे. गेले आठ दहा दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपे सूर्याच्या कडक उन्हात तग धरू शकणार नाहीत. मृग नक्षत्र संपून आद्र्रा नक्षत्रची पहाट उजाडणार आहे. पण जाणारे नक्षत्र येणा:या नक्षत्रला साथ देत नसल्याने आभाळ निरभ्र आहे. हवेत गारवा नाही. दिवसभर कडक उन्हे पडतात. अशा कठीण परिस्थितीत खरीपाचा हंगाम मान्सूनने दडी मारल्याने संकटाच्या सीमारेषेवर उभा आहे.
शेतीचे यंदा खरीप हंगामाचे आपत्कालीन नियोजन शेतक:यांना समजावून सांगण्यात व त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचा फारसा प्रय} अद्याप कृषी विभागाकडून झालेला नाही. पावसाची समस्या अधिक उग्र झाल्यास शेतक:यांच्या खरीप हंगाम वाचविण्यासाठी पिक बदल करण्याची परिस्थितीही रायगडात नाही. निव्वळ भाताचे उत्पादन होणारी शेती असल्याने कमी दिवसात उत्पादन घेणारी बियाणो यासाठी कृषी विभागाची जनजागरण मोहिम हाती घेणो पुढील काही दिवसात  अपरिहार्य आहे. राज्य व केंद्रीय पातळीवरून मान्सूनच्या या अपत्तीदर्शक संभाव्य परिस्थितीचे अवलोकन करणो गरजेचे ठरणार आहे. कारण शेती, उद्योग, ग्राहक या तीन घटकांचे भवितव्य मान्सूनवर अवलंबून आहे. 
मान्सून या घटकाचा जीवनदाता आहे. मान्सूनचा फटका जिथे जिथे बसतो तिथे याला जबर फटका बसतो. रायगडाची शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने जो पेरा उगवला आहे तो मान्सून अभावी टिक णार नाही. संकटाचे काळे ढग शेतक:यांच्या हृदयावर गहिरे आघात करीत आहेत. प्रारंभीचा पेरा पावसाअभावी करपून गेला आणि जाणार या भीतीमुळे शेतकरी अर्धमेला झालाय. 
दुबार पेरणीसाठी नव्याने बियाणो खरेदी करायची, त्यासाठी लागणारा पैसा व पावसाचे लहरी चित्र अशा विचित्र परिस्थितीमुळे शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या अस्मानी संकटामुळे कासावीस झाला आहे. पावसाचे आगमन लवकर व्हावे अशीच प्रार्थना  शेतकरी करीत आहेत.  (वार्ताहर)
 
4रायगडातील प्रारंभीची धूळपेरणी पूर्ण होऊन काही  मृगधारा बरसल्या ख:या परंतु त्यामध्ये स्थिरता नसल्याने मृगाचा पाऊस जेमतेम पडला. त्यानंतर तापमानवाढीचा जबर फटका उगवलेल्या रोपांना बसत आहे. गेले आठ दहा दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपे सूर्याच्या कडक उन्हात तग धरू शकणार नाहीत.
 
4रायगडाची शेती पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने जो पेरा उगवला आहे तो मान्सूनअभावी टिकणार नाही. प्रारंभीचा पेरा पावसाअभावी करपून गेला आणि जाणार या भीतीमुळे शेतकरी अर्धमेला झालाय. दुबार पेरणीसाठी नव्याने बियाणी खरेदी करायची तर त्यासाठी लागणारा पैसा आणि पावसाचे लहरी चित्र यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे.