शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

औषध कंपन्या, कृषी केंद्रांवर फौजदारी गुन्हे - सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:14 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ शेतकरी, शेतमजूर दगावले. ४५० जणांवर उपचार करून सुटी देण्यात आली. यात दोषी आढळणा-या कीटकनाशक कंपन्या आणि त्यांची विक्री करणा-या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्चाधिकार समितीला दिल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.

 यवतमाळ  - कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ शेतकरी, शेतमजूर दगावले. ४५० जणांवर उपचार करून सुटी देण्यात आली. यात दोषी आढळणा-या कीटकनाशक कंपन्या आणि त्यांची विक्री करणा-या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्चाधिकार समितीला दिल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. फवारणीमुळे विषबाधित झालेल्या शेतक-यांची भेट आणि मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी खोत बुधवारी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यांनी आर्णी तालुक्यातील शेंदुरसणी येथील मृत शेतक-याच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल विषबाधित शेतक-यांची वास्तूपूस केली. तत्पूर्वी त्यांना शेतकरी संघर्ष समितीने निवेदन सादर केले. हे निवेदन स्वीकारत असतानाच एका इसमाने त्यांच्या अंगावर फवारणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखले. नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विषबाधा प्रकरणी चौकशीसाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन झाली असून आपण आपल्या दौºयाचा अहवाल समितीला सादर करणार असल्याचे सांगितले. ना. खोत म्हणाले, उपचार करून घरी परतलेल्या विषबाधितांना रूग्ण कल्याण समितीतून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कपाशीचे बीजी-२ हे वाण कीडींना बळी पडत असल्याने त्याला केवळ संकरित वाण म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार आहे. यामुळे बीजीच्या किंमती कमी होतील. आता प्रत्येक गावात कृषी ग्राम समिती स्थापन केली जाईल. या समितीकडे तक्रारी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. फवारणीमुळे विषबाधा होणे ही कृषी विभागाची जबाबदारी असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र अडीच महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात या घटनांना सुरूवात होऊनही आरोग्य विभागाने याची माहिती का दडविली?, इतर विभागांनीही माहिती का दिली नाही याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश दुशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. ऊसाचे औषध कपाशीवर कसे ?‘उलीस’ नामक औषधाचा ऊसासाठी वापर केला जातो. हेच औषध यवतमाळ जिल्ह्यात कपाशीसाठी वापरण्यात आल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे हे औषध कुठून आले, त्याची कोणत्या कृषी केंद्रातून विक्री झाली या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे ना. सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtraमहाराष्ट्र