शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

जनावरांची वाहतूक रोखणे ठरणार गुन्हा !

By admin | Updated: March 28, 2015 00:10 IST

वाहने अडविण्याचा अधिकार संघटनांना नाही : ‘महाराष्ट्र जीव संधारण १९९५’ या कायद्यात सुधारणा; पोलीस अधिकारीच लावणार ‘ब्रेक’--लोकमत विशेष

संजय पाटील - कऱ्हाड  गोवंश हत्या बंदीच्या कायद्याचे बहुतांश सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात आले; पण ‘महाराष्ट्र जीव संधारण १९९५’ या कायद्यात नुकतीच करण्यात आलेली सुधारणा व त्यातील तरतूद यापासून सामाजिक संघटना व कार्यकर्ते अद्यापही अनभिज्ञ आहेत. जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडविणे यापुढे सामाजिक कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. नवीन सुधारणेनुसार अशी वाहने अडविणे गुन्हा ठरणार असून, संबंधिताला शिक्षेचीही तरतूद आहे.कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज येथे जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो काही दिवसांपूर्वी अडविण्यात आला होता. त्यावेळी तेढ निर्माण होऊन युवकांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. परिणामी, तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ठिकठिकाणी अशा घटना वारंवार घडतात. मुळात गोवंश वाहतुकीबद्दल अनेक सामाजिक संघटना संवेदनशील आहेत. एखाद्या वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित संघटनांचे पदाधिकारी पाठलाग करून ती वाहने अडवितात. वाहनांमधील जनावरांची माहिती घेतात. तसेच संबंधित वाहनात गोवंशातील जनावरं असल्यास ते वाहन अडवून ठेवून त्याची माहिती पोलिसांना देण्यात येते. पोलीस त्याठिकाणी पोहोचेपर्यंत संघटनेचे पदाधिकारी वाहनाच्या चालकाला किंवा त्याच्यासोबत असणाऱ्यांना जाब विचारतात. प्रसंगी त्यांना मारहाणही केली जाते. पोलीस पोहोचल्यानंतर वाहनासह त्याच्या चालकाला पोलिसांच्या स्वाधिन करून पदाधिकारी तेथून निघून जातात. त्यापुढील सर्व कायदेशीर कार्यवाही पोलिसांकडून पूर्ण करण्यात येते. आजपर्यंत अशाच पद्धतीने गोवंश व इतर जनावरांची वाहतूक रोखली जायची; पण काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र जीव संधारण १९९५’ या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. ही सुधारणा दि. ४ मार्च २०१५ रोजी राजपत्रात प्रसिद्धही करण्यात आली आहे.कायद्यातील सुधारणेनुसार कार्यकर्त्यांना जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडविण्याचा अधिकार नाही. अशी वाहने अडविण्याचा अधिकार फक्त पोलीस उपनिरीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहे. सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अथवा इतर कोणत्याही नागरिकाने अशी वाहने अडविल्यास त्यांनाच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.पाळीव किंवा वन्यप्राण्याच्या संरक्षणाची जबाबदारी वेगवेगळ्या खात्यांकडे असते. मात्र, काही समाजविघातक प्रवृत्ती संपूर्ण माहिती न घेता चुकीचे काम करतात. त्यामुळे घटनाबाह्य कृत्य होऊन समाज वेठीस धरला जातो. जनावरांबाबत बेकायदेशीर कृत्य घडत असल्यास त्याची माहिती संबंधित खात्याला देणे गरजेचे आहे. स्वत:लाच कायद्याच्या कचाट्यात अडकवू नये. युवकांनीही प्रक्षोभक आवाहनाला बळी पडू नये.- मितेश घट्टे,  --पोलीस उपाधीक्षक, कऱ्हाडअजामीनपात्र गुन्हा ---जनावरांची वाहतूक करणारी वाहने परस्पर अडविणे, हे यापूर्वी खुलेआम घडत होते. अनेकदा हीच मंडळी स्वत: वाहने घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असत. पण यापुढे दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. अशी तक्रार दाखल झाल्यास वाहन अडविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात येणार असून, हा गुन्हा अजामीनपात्र आहे. अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे.वाहने न अडवता पोलिसांना सांगा !एखाद्या वाहनातून कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या जनावरांची वाहतूक होत असल्यास अथवा संबंधित वाहनात गोवंशातील जनावरं असल्यास संघटनांचे कार्यकर्ते किंवा नागरिकांनी वाहन न अडवता त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे अधिकारी संबंधित वाहन अडवून तपासणी करतील. बेकायदेशीर कृत्य आढळल्यास संबंधित वाहन चालकासह इतरांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होईल. पाच वर्षे कारावासदाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयासमोर या खटल्याचे कामकाज चालेल. त्यामध्ये संबंधित आरोपी दोषी आढळल्यास त्याला पाच वर्षे कारावास व दहा हजारांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.