शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:54 IST

Supriya Sule vs Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचा पलटवार

Supriya Sule vs Devendra Fadnavis: महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. मुख्यमंत्री म्हणतात की पुण्यात दादागिरी वाढली. या परिस्थितीला जबाबदार कोण? तुम्ही काय कारवाई करताय?, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली.

"सातत्याने राज्यात गुन्हेगारी वाढतेय. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगतेय, मुख्यमंत्री म्हणतात की पुण्यात दादागिरी वाढली. गुंतवणूक येत नाहीये, हेही त्यांनी कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. याच्यामागे कोण आहे? या कंत्राटदारांना कुणाचे पाठबळ मिळते आहे. माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना वाटत असेल पुण्यात दादागिरी होतेय, त्यामुळे पुण्यात गुंतवणूक येणार नाही. मग मला मुख्यमंत्र्यांना विचारायाचंय की तुम्ही काय कारवाई केली? याला जबाबदार कोण, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे," असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासाकरिता उशिरा का होईना राज्य सरकारच्या वतीने एसआयटीची स्थापना करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमचा पक्ष सातत्याने करत होता. महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांची ज्याप्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्या संदर्भात मागील आठवड्यात मी लोकसभेमध्ये बोलले. मला आशा आहे की एसआयटीच्या मार्फत करण्यात येणारा तपास पारदर्शक व्हावा."

"बिहारमध्ये निवडणूक आयोग जे निर्णय घेतेय, नाव कमी जास्त वाढवली जात आहेत, त्यात पारदर्शकता नाही असे बिहारमधील सगळ्या पक्षाचे लोक म्हणत आहेत. बिहार निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उद्भवले आहेत. त्यावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी. कारभार पारदर्शक व्हावा. ही सशक्त लोकशाही आहे. हा देश कोणाच्या मनमानीने चालणार नाही, संविधानाने हा देश चालणार आहे," असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Crimeपुणे क्राईम बातम्याBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या