शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मोठी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; 'प्लॅटफॉर्म तिकीट' बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 13:45 IST

Central Railway: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णयमध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंदअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत कोरोनाची स्थिती गंभीर होत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आता 'प्लॅटफॉर्म तिकीट' देणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (cr railway decided to stop issuing platform tickets on some stations to prevent spread of corona)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा विपरीत परिणाम म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांत वास्तव्यास असलेले स्थलांतरित कामगार पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरवली येथे आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी स्थलांतरित कामगार दाखल होत असून, यात दिवसागणिक भरत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कामगारांना सोडण्याकरिता येणाऱ्यांमध्येही वाढ होत असल्यामुळे रेल्वेकडून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

कोणत्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद?

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव मित्तल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांवर आता यापुढे  प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. तत्काळ प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आला आहे. 

अफवांवर विश्वास ठेवू नका

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. मात्र, ही बाब खरी नाही. कोणीही अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू नयेत. तसेच अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच मे महिन्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विविध ठिकाणी जाणाऱ्या आणखी काही रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, फक्त कन्फर्म्ड तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात असून, प्रवाशांनी सर्वांनी मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि वारंवार हात धुवावेत, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. 

“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या मजूर, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. कित्येक किलोमीटर पायी चालत हे अंतर पार करावे लागले. गेल्या वर्षी बांद्रा टर्मिनसबाहेर दोन वेळा लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार, या अफवेमुळे गर्दी उसळली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामध्ये अनेक कामगारांचा समावेश होता. ती भीती आजही कायम आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwestern railwayपश्चिम रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbai Localमुंबई लोकल