शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Corona Vaccination: कोरोना संकटात राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांनी चिंता वाढवली; तिसरी लाट येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 07:52 IST

Corona Vaccination: लसीकरणाचा वेग कमी असल्यानं तिसऱ्या लाटेचा धोका

नवी दिल्ली: देशातील कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मात्र तरीही नव्या व्हेरिएंटचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असल्यास लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र देशातील ४८ जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग अतिशय आहे. या जिल्ह्यांमधील परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेणार आहेत.

देशातील ४८ जिल्ह्यांमधील लसीकरणाची स्थिती गंभीर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांच्या खाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या ४८ जिल्ह्यांपैकी २७ जिल्हे ईशान्यकडचे आहेत. यामध्ये मणिपूर आणि नागालँडमधील प्रत्येकी ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. ईशान्याकडील दर ५ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या यादीत झारखंडच्या ९, तर महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी बैठक घेण्यापूर्वी लसीकरणाचा वेग कमी असलेल्या राज्यांमध्ये घरोघरी लसीकरण अभियान सुरू करण्यात येऊ शकतं. या अभियानाच्या अंतर्गत लसीकरणाचा वेग कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येईल. मंत्रालयानं गोळा केलेला ४८ जिल्ह्यांची माहिती २७ ऑक्टोबरपासूनचा आहे. त्यादिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दुसऱ्या डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. देशातील १०.३४ कोटींहून अधिक जणांना निश्चित वेळात दुसरा डोस मिळालेला नाही, असं मंडाविया म्हणाले होते. त्यासोबतच त्यांनी दुसऱ्या डोसचा वेग वाढवण्याची गरज बोलून दाखवली. नोव्हेंबर २०२१ च्या शेवटपर्यंत लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व जणांना लसीचा १ डोस देण्यात यावा, अशी सूचना मंडाविया यांनी बैठकीत केली.

राज्यातील कोणते जिल्हे पिछाडीवर? किती जणांना पहिला डोस?औरंगाबाद (४६.५%), नंदूरबार (४६.९%), बुलढाणा (४७.६%), हिंगोली (४७.८%), नांदेड (४८.४%) आणि अकोला (४९.३%) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस