शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ध्वनिप्रदूषण प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयाची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:20 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मंगळवारी न्या. अभय ओक यांच्यासह मुख्य न्यायधीशांचीही लेखी माफी मागत सर्व आरोप मागे घेतले.

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मंगळवारी न्या. अभय ओक यांच्यासह मुख्य न्यायधीशांचीही लेखी माफी मागत सर्व आरोप मागे घेतले. मात्र हे आरोप कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले आहेत. हे उघड करण्यास राज्य सरकारने नकार दिला. या प्रकारात सहभागी असलेल्यांनी व नसलेल्यांनीही न्यायालयाची माफी मागतली आहे. संपूर्ण राज्य सरकारनेच माफी मागितली आहे, असे महाअधिवक्ता यांनी आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ही माफी स्वीकारत अखेरीस तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम दिला.सोमवारच्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला लेखी माफी मागण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारने मुख्य न्यायधीशांसह उच्च न्यायालय न्या. अभय ओक यांची बिनशर्त माफी मागत सर्व आरोप मागे घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच गृह खात्याचे उपसचिव विजय पाटील यांचे माफीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र या प्रतिज्ञापत्रात ध्वनीप्रदूषणासंदर्भातील याचिका वर्ग करण्यासाठी व न्या. ओक यांच्यावर पक्षपाताचा आरोप कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, याबाबत खुलासाकरण्यात आला नाही. त्यावरन्या. ओक यांनी नाराजी दर्शवली.जर आम्हाला अवमान नोटिस बजावयाची झाली, तर कोणाविरूद्ध काढायची? असा सवाल न्या.ओक यांनी महाअधिवक्त्यांनाकेला.त्यावर महाअधिवक्त्यांनी न्या. ओक यांना नावाचा खुलासा करण्याचा आग्रह धरू नये, अशी विनंती केली. या घटनेत सहभागी असलेल्यांनी व नसलेल्यांनीही मुख्य न्यायधीशांसह, उच्च न्यायालयाची व न्या. ओक यांची माफी मागितली आहे. एकूणच संपूर्ण राज्य सरकारने न्यायालयाची माफी मागितली आहे, असे कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. मात्र उच्च न्यायालय अवमान नोटीसीबाबत पुर्नोच्चार करत असल्याचे पाहून ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी मध्यस्थी केली. न्यायालयाकडून राज्य सरकारला कडक आणि स्पष्ट संदेश गेला आहे. या उदाहरणावरून पुन्हा कोणीही उच्च न्यायालयाचा अपमान करण्यास धजावणार नाही. त्यामुळे न्यायालयाने अवमान नोटीस काढू नयेत. हे प्रकरण इथेच मिटवावे, अशी विनंती अंतुरकर यांनी न्यायालयाला केली. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य करत राज्य सरकारची माफी स्वीकारली. यापुढे न्यायालयाच्या कामकाजात ढवळाढवळ केलेली चालणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही, असे न्या. ओक यांनी स्पष्ट केले. या याचिकांवरील पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.सामान्यत: अशा केसेमध्ये आम्ही अवमानाची कारवाई करतो. मात्र या केसमध्ये आम्ही करणार नाही. तसे न करण्याची अनेक कारणे आहेत. कारण या इमारतीचा पाया भक्कम आहे. राज्य सरकारने काही आरोप केले तरी या संस्थेचा पाया डळमळीत होणार नाही. त्याशिवाय आम्ही सांविधानिक पद भूषवित आहोत. त्यामुळे आम्ही मोठेपणा दाखविणे, अपेक्षित आहे, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकार