शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

ध्वनिप्रदूषण प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयाची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:20 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मंगळवारी न्या. अभय ओक यांच्यासह मुख्य न्यायधीशांचीही लेखी माफी मागत सर्व आरोप मागे घेतले.

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मंगळवारी न्या. अभय ओक यांच्यासह मुख्य न्यायधीशांचीही लेखी माफी मागत सर्व आरोप मागे घेतले. मात्र हे आरोप कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले आहेत. हे उघड करण्यास राज्य सरकारने नकार दिला. या प्रकारात सहभागी असलेल्यांनी व नसलेल्यांनीही न्यायालयाची माफी मागतली आहे. संपूर्ण राज्य सरकारनेच माफी मागितली आहे, असे महाअधिवक्ता यांनी आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ही माफी स्वीकारत अखेरीस तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम दिला.सोमवारच्या सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला लेखी माफी मागण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारने मुख्य न्यायधीशांसह उच्च न्यायालय न्या. अभय ओक यांची बिनशर्त माफी मागत सर्व आरोप मागे घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच गृह खात्याचे उपसचिव विजय पाटील यांचे माफीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र या प्रतिज्ञापत्रात ध्वनीप्रदूषणासंदर्भातील याचिका वर्ग करण्यासाठी व न्या. ओक यांच्यावर पक्षपाताचा आरोप कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, याबाबत खुलासाकरण्यात आला नाही. त्यावरन्या. ओक यांनी नाराजी दर्शवली.जर आम्हाला अवमान नोटिस बजावयाची झाली, तर कोणाविरूद्ध काढायची? असा सवाल न्या.ओक यांनी महाअधिवक्त्यांनाकेला.त्यावर महाअधिवक्त्यांनी न्या. ओक यांना नावाचा खुलासा करण्याचा आग्रह धरू नये, अशी विनंती केली. या घटनेत सहभागी असलेल्यांनी व नसलेल्यांनीही मुख्य न्यायधीशांसह, उच्च न्यायालयाची व न्या. ओक यांची माफी मागितली आहे. एकूणच संपूर्ण राज्य सरकारने न्यायालयाची माफी मागितली आहे, असे कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. मात्र उच्च न्यायालय अवमान नोटीसीबाबत पुर्नोच्चार करत असल्याचे पाहून ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी मध्यस्थी केली. न्यायालयाकडून राज्य सरकारला कडक आणि स्पष्ट संदेश गेला आहे. या उदाहरणावरून पुन्हा कोणीही उच्च न्यायालयाचा अपमान करण्यास धजावणार नाही. त्यामुळे न्यायालयाने अवमान नोटीस काढू नयेत. हे प्रकरण इथेच मिटवावे, अशी विनंती अंतुरकर यांनी न्यायालयाला केली. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य करत राज्य सरकारची माफी स्वीकारली. यापुढे न्यायालयाच्या कामकाजात ढवळाढवळ केलेली चालणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही, असे न्या. ओक यांनी स्पष्ट केले. या याचिकांवरील पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.सामान्यत: अशा केसेमध्ये आम्ही अवमानाची कारवाई करतो. मात्र या केसमध्ये आम्ही करणार नाही. तसे न करण्याची अनेक कारणे आहेत. कारण या इमारतीचा पाया भक्कम आहे. राज्य सरकारने काही आरोप केले तरी या संस्थेचा पाया डळमळीत होणार नाही. त्याशिवाय आम्ही सांविधानिक पद भूषवित आहोत. त्यामुळे आम्ही मोठेपणा दाखविणे, अपेक्षित आहे, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकार